साहित्य भारती, डोंबिवली विभागातर्फे मराठी साहित्यप्रेमी नागरिकांसाठी लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २० वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला या लेख स्पर्धेत भाग घेता येणार आहे. लेख पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे.
प्रसार माध्यमे आणि त्यांचे परिणाम, सणांचे बदलते स्वरूप, दोन पिढ्यांमधील समन्वय, पर्यावरण जागरूकता असे या लेख स्पर्धेचे विषय आहेत. प्रत्येक स्पर्धकाला ६०० ते १००० शब्दांचा टंकलिखित केलेला (टाइप केलेला) लेख पाठवायचा आहे. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षिसे आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
लेख पाठविण्यासाठी पत्ता:- (प्रत्यक्ष लेख ११:०० ते १२:०० या वेळेतच पाठवावे)
१)श्रीमती श्रद्धा सु.जोशी (९८३३६२६५७५)
ए/१२, नीलकंठ प्रभा, को.ऑ.हाउसिंग सोसायटी, आयरे रोड, (पाटकर शाळेजवळ) रामनगर, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१.
२) श्रीमती उज्ज्वला अ.लुकतुके (९८१९३८८४१५)
बी २०४, ओम वैभव पार्क, टंडन रोड ,ठाकूर हॉल समोर
डोंबिवली (पूर्व) ४२१२०१.