लखनौ : अमरोहाच्या बछरायुंमध्ये एका हिंदू मुलाचे मुस्लीम मुलीवर प्रेम झाले. दि. ९ मे २०२४ रोजी आर्य समाज मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले. यानंतर मुलीचे कुटुंबीय त्या मुलाला धमकावत होते. दरम्यान, दि. १९ जुलै रोजी मुलीचा मेहुणा, वडील आणि काकांनी मुलाच्या घरावर हल्ला करून त्याला मारहाण करून मुलीला सोबत नेले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुलगी प्रौढ असून तिला वडिलांच्या घरी राहायचे नाही, त्यानंतर पोलिसांनी मुलीला आपल्या संरक्षणात ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विपिन सिंग असे पीडित तरुणाचे नाव आहे. दि. १९ जुलै २०२४ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे सासरे अली जफर, मेव्हणा साहुन आणि चुलत सासरे दिलशेर यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला आणि पत्नीला घेऊन गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली.
वृत्तानुसार, विपिनच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलीच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीला न्यायालयात हजर केले. बुधवार, दि. २४ जुलै २०२४ मुलीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचे म्हणणे नोंदवले. सध्या मुलीला जिल्हा रुग्णालयातील सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.