पाटणा : बिहारमधील गया येथे एका वयोवृद्ध आजोबाने लग्न केल्याची बातमी परिसरात पसरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कलीमुल्ला ८० वर्षांचा आहे, तर ज्या मुलीशी त्याने लग्न केले आहे ती केवळ २५ वर्षांची आहे. प्रकरण शेरघाटी अमास ब्लॉकच्या हमजापूरचे आहे. तिच्या लग्नाला योग्य ठरवणारे तिच्या जवळचे लोक म्हणतात की प्रेमाला वय नसते. या लग्नात कुटुंबीयांसह गावकरीही सहभागी झाले होते.
या लग्नसोहळ्याला अनेक माध्यम प्रतिनिधींनी देखील हजेरी लावली होती. नवरदेवाचे नाव कलिमुल्ला नुरानी आहे, तर ज्या मुलीशी त्याने लग्न केले तिचे नाव रेश्मा परवीन आहे. रेश्मा परवीन आमस ब्लॉकच्या हमजापूर वॉर्ड क्रमांक ११ मध्ये राहते. तर ८० वर्षीय कलिमुल्ला नुरानी हा बैदा गावचा रहिवासी आहे. दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केले. मात्र, यावेळी कलीमुल्ला हे लोकांना सांगताना दिसले की, त्यांचे वय ८० वर्षे नसून ते केवळ ५० वर्षांचे आहे.
या लग्नाला घरच्यांना कोणतीही अडचण नाही. हे लग्न आपण आनंदाने स्वीकारत असल्याचेही तरुणीचे म्हणणे आहे. माध्यमांसमोरही त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली. मीडियाने कलीमुल्लाला या वयात लग्न का करत आहात, असे विचारले असता, त्याने सांगितले की, लग्नाचे वय नसते. आता आपली काळजी घेणारे कोणी नाही, त्यामुळे लग्न करत आहे, असे त्याने सांगितले.