मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, नवीन स्टार्टअप्सवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीसाठी अनेक नव्या तरतूदी करण्यात आल्या असून नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. केंद्राच्या नवीन रोजगार योजना नवीन नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा नोकऱ्यांच्या औपचारिकीकरणाला गती देतील, असे ॲक्सिस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि ॲक्सिस कॅपिटलच्या ग्लोबल रिसर्चचे प्रमुख नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, सरकारने प्रस्तावित केलेल्या योजनांचे परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. त्यानंतर अचूक परिणाम दिसून येतील. तसेच, सरकारच्या रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांचा नोकऱ्यांवर खूप मोठा परिणाम होईल कारण खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक सुधारित आर्थिक स्थिरता, भांडवलाची घटती किंमत आणि नियम सुलभतेसह वाढू लागेल, असा अंदाज देखील नीलकंठ मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अँजल टॅक्स रद्द केला असून यामाध्यमातून नवीन स्टार्ट अप्सना मोठा फायदा होणार आहे. एकंदरीत, नवीन स्टार्ट अप्सद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगारातून आर्थिक स्थिरता, भांडवलाची घटती किंमत आणि नियम सुलभता वाढू लागेल. विशेष म्हणजे नवीन नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा फॉर्मलायझेशन अधिक होईल, अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे.