यशवीर महाराजांचा सेक्युलर-इस्लामिक कट्टरपंथीयांवर हल्लाबोल

19 Jul 2024 13:04:20

यशवीर महाराज

मुंबई (प्रतिनिधी) : स्वामी यशवीर महाराज (Yashveer Maharaj on Kattarpanthi) यांनी गुरुवार, दि. १८ जुलै रोजी इस्लामिक कट्टरपंथी आणि तथाकथित 'सेक्युलर' विरोधात एका व्हिडिओद्वारे विधान जारी केले होते. अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत, ज्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक हिंदू देवी-देवतांचे नाव घेऊन हॉटेल, दुकाने, ढाबे आणि फळांचे ठेले चालवत आहेत. याला यशवीर महाराज अनेक दिवसांपासून विरोध करत आहेत.

हे वाचलंत का? : मनोरमा खेडकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी

स्वामी यशवीर महाराज यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मुझफ्फरनगरमधील कावड यात्रेच्या मार्गावर खाद्यपदार्थांची दुकाने, फळांचे स्टॉल इत्यादी चालवणारे मुस्लिम दुकानदार त्यांच्या दुकानांना हिंदू देवतांचे नाव का देतात, असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व दुकाने आणि ठेल्यांवरील फलकांवर मालक/कर्मचाऱ्यांची नावे ठळक अक्षरात लिहावीत, अशी मागणी आम्ही केली होती. तेव्हा पोलिसांनी आमची मागणी मान्य करून तशा सूचना दिल्या. दुकानदार सूचनांनुसार मालकांची नावे ठळक अक्षरात लिहीतही आहेत. मात्र, ओवेसीसारखे काही कट्टरपंथी पोलिसांच्या सूचनांवर आक्षेप घेत आहेत."

पुढे ते म्हणाले, "मुस्लिमांच्या हॉटेल्स आणि ढाब्यांचा आम्हाला काहीही त्रास नाही. ते चालवायला मोकळे आहेत पण त्यांनी दुकाने हिंदूंच्या देवी-देवतांच्या नावाने आणि हिंदूंच्या भ्रामक नावाने चालवण्याऐवजी स्वतःच्या नावाने चालवावीत. जर कोणाला वाटत असेल की सर्व काही पूर्वीप्रमाणेच चालू राहील, तर आम्ही किमान मुझफ्फरनगरमध्ये असे होऊ देणार नाही. जर कोणी हे करत राहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवून ते थांबवू.”

कावड यात्रेवर हल्ला झाल्यास मोहम्मद जुबेर जबाबदार असेल!
“हा तोच मोहम्मद जुबेर आहे ज्याने आपल्या पोस्टद्वारे मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकावले आणि अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्याच्यावर अनेक खटले सुरू आहेत. त्याच्यावर मुझफ्फरनगरमध्येही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की, कोणत्याही कावड यात्रेकरूला अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही कावड यात्रेकरूला काही झाले तर त्यासाठी मोहम्मद जुबेरला जबाबदार धरले पाहिजे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्याला परदेशी निधी मिळतो का हे शोधण्यासाठी त्याच्या खात्यांचीही चौकशी करण्यात यावी.", असे यशवीर महाराजांचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0