नवी दिल्ली : भारत-बांगलादेशच्या सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवान आणि बांगलादेशी तस्कर यांच्यात चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत एका बांगलादेशी तस्कराचा मृत्यू झाला. भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर तस्करांवर कारवाई सुरूच आहे.
भारताची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांना बीएसएफ जवानांनी पाहिले. दि. ९ मे २०२४ सकाळी भारत-बांगलादेश सीमेजवळ आणि भारतीय हद्दीत सुमारे १५० यार्डच्या आत बांगलादेशी तस्कर मारला गेला. सीमेच्या कुंपणाच्या दोन्ही बाजूला धारदार शस्त्रे घेऊन आलेल्या तस्करांच्या मोठ्या गटाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बेकायदेशिर मालाची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैनिकांनी या लोकांना आव्हान दिले तेव्हा त्यांनी लक्ष दिले नाही आणि ते आक्रमक झाले.
तस्करांनी ड्युटीवर असलेल्या बीएसएफ जवानावर हल्ला करून त्याच्याकडून शस्त्र हिसकावून घेण्याच्या उद्देशाने त्याला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्याने सांगितले. जवानाने आपल्या बचावात, गोळीबार केला, ज्यात एका बांगलादेशी तस्कर ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.