नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर असून पुन्हा एकदा जिंकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान होते. त्यांनी अजय राय यांच्याविरुध्द १ लाख ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येण्याची शक्यता असून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघात मोदींसाठी ही निवडणूक महत्त्वाची होतीच. परंतु, विरोधकांचे फारसे आव्हान त्यांच्यासमोर नव्हते. दरम्यान, निर्णायक आघाडी घेत पंतप्रधान मोदींनी १ लाखांनी आघाडी घेत आपला विजय जवळपास निश्चित केला आहे.
कोण किती मतांनी आघाडीवर
- येथे क्लिक करा
सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाला बहुमत मिळत सत्तास्थापनेची संधी मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासोबतच एक्झिट पोलचे अंदाजही येऊ लागले असून बहुतांश ठिकाणी भाजपशी युती असलेल्या एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे.
दरम्यान, एनडीए विरुध्द इंडिया आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळाली असून एक्झिट पोलनुसार एनडीए बहुमतासह तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करता येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ०१ जून रोजी मतदान संपन्न झाल्यानंतर आता निवडणूकीच्या निकालाला अवघे काहीच तास उरले असून जनतेने कुणाला कौल दिलाय हे लवकरच कळणार आहे. या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.