मुंबई: आज लोकसभा निवडणूकीचा निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना ३९ ट्रिलियन रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. बीएसईवरील सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल ४२४ ट्रिलियन वरून घसरत ३९ ट्रिलियनवर पोहोचले आहे.
बीएसई मिडकॅप ८ टक्क्यांनी घसरले आहे. तर स्मॉलकॅपमध्ये १०.३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स मधील हेवी वेट कंपनी रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी समभागात घसरण झाली आहे. एनएसईत देखील पीएसयु समभागात (Stocks) मध्ये १५.७ टक्क्यांनी घट झाली आहे. एक्झिट पोलनंतर बाजारात विश्वास असताना आता मात्र गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी पडल्याने ही मोठी घसरण झाली आहे.
19 एप्रिलपासून सुरू झालेल्या सात टप्प्यातील निवडणुकीचा अंतिम टप्पा संपल्यानंतर शनिवारी एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात आले होते.