माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता सर्वात महत्वाची : उपमुख्यमंत्री फडणवीस

06 Feb 2024 19:04:20

Fadanvis


मुंबई :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांचे लोकार्पण मंगळवारी पार पडले. दरम्यान, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता सर्वात महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते.

 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपण पाचही महामंडळाच्या वेबसाईटचे लोकार्पण केले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि इथे पारदर्शकता सर्वात महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आपली सगळी माहिती ही वेबसाईटवर असणं अत्यंत चांगली गोष्ट आहे," असेही ते म्हणाले. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या ५ महामंडळांच्या संकेतस्थळांवर संबंधित विभागासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना माहिती सहजासहजी उपलब्ध होणार आहे.





Powered By Sangraha 9.0