"देशप्रेमामुळे मुस्लिम शांत नाही, तर..." - 'या' मुस्लिम नेत्याने दिली धमकी

04 Feb 2024 15:24:21
 tauqir
 
नवी दिल्ली : "मुस्लिम घाबरत नाहीत. मुस्लिमांना देशात जातीयवादाचे वातावरण नको आहे. मुस्लिमांना देशात युद्धाचे वातावरण नको आहे, मुस्लिमांचे आपल्या देशावर प्रेम आहे, ते कोणाला घाबरत नाहीत आणि देशावरील प्रेमामुळे सर्वजण संयम बाळगून आहेत." असा धमकीवजा इशारा इत्तेहादे मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी दिला आहे.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर, त्यांनी हे वक्तव्य केले. मौलाना तौकीर रझा यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत हा भारतरत्नचा घोर अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, "ज्यांनी चांगले काम केले त्यांना भारतरत्न दिला जातो. पण लालकृष्ण अडवाणी यांनी कोणतेही चांगले काम केलेले नाही."
 
लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे याची घोषणा केली आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0