भगवान महावीरांचे विचार आजही समर्पक : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

12 Feb 2024 19:16:36
RSS Sarsanghchalak dr mohanji bhagwat
 
नवी दिल्ली : भगवान महावीर यांचे यंदाचे २ हजार ५५० वे निर्वाण वर्ष आहे. मात्र, आजही त्यांचे विचार समर्पक असून समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षाच्या स्मरणार्थ 12 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख वक्ते होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमास समस्त जैन समाजातील संत आणि साध्वी उपस्थित होत्या. राष्ट्रीय संत परंपाचार्य प्रज्ञासागर मुनिराज, चतुर्थ पट्टाचार्य सुनीलसागर मुनिराज, प्रवर्तक डॉ राजेंद्र मुनी, साध्वी अनिमाश्री आणि महासाध्वी प्रीतीरत्न यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आम्ही दररोज एकात्मता स्तोत्राचे पठण करतो ज्यात वेद, पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता, जैन धर्मग्रंथ, बौद्ध ग्रंथ, त्रिपिटक गुरुग्रंथसाहिब हे ज्ञानाचे सर्वोत्तम भांडार आहेत. जगातील प्रत्येकाला शाश्वत आनंद देणारे सत्य हवे होते. पण जग आणि भारत यात फरक इतकाच होता की जग बाहेर शोधल्यावर थांबले आणि बाहेर शोधल्यावर आपण आत शोधू लागलो आणि त्या सत्यापर्यंत पोहोचलो. ते खरे आहे पण ते पाहणाऱ्याच्या नजरेचे असते. पाण्याचा पेला आहे, एक म्हणतो अर्धा भरला आहे, दुसरा म्हणतो अर्धा रिकामा आहे, तिसरा म्हणतो कमी पाणी आहे, चौथा म्हणतो ग्लास मोठा आहे. वर्णन वेगळे पण वस्तु एकच, परिस्थिती तीच. त्यामुळे प्रत्येक घटनेचा सम्यकतेने विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

महावीर स्वामीचे विचार आजही समर्पक आहेत. सुख भौतिक गोष्टीत नसते, याची शिकवण त्यांनी दिली. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून एकटे राहण्याची गरज नाही, व्यक्तिवाद बाजूला ठेवा असेही त्यांनी सांगितले होते. सर्वांशी एकोप्याने वागा, अहिंसेचे पालन करा, संयम पाळा, चोरी करू नका, दुसऱ्याच्या पैशाची लालसा बाळगू नका, या सर्व गोष्टी जीवनाचा मार्ग म्हणून त्यांनी सांगितल्या होत्या आणि तोच शाश्वत मार्ग आहे, असेही सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0