भारत दाखवतोय जगाला आशेचा किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    21-Oct-2024
Total Views |
 

modi
 
नवी दिल्ली : ( PM Narendra Modi ) "भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभुतपूर्व वेगाने काम करत आहे. जग चिंतेने बुडालेले असताना भारत आशेचा किरण दाखवत आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद या कार्यक्रमात सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी केले आहे.
 
भविष्यातील चिंता हा चर्चेचा सामान्य विषय आहे. कोविड महामारी, कोविडनंतरचा आर्थिक ताण, महागाई आणि बेरोजगारी, हवामान बदल, जगाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेले संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय, निरपराध लोकांचे मृत्यू, भू-राजकीय तणाव आणि संघर्ष यांसारखी अलीकडील आव्हाने समोर असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक शिखर परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे. भारत आपल्या शतकावर विचार करत आहे. जागतिक अशांततेच्या या काळात भारत हा आशेचा किरण बनला आहे. जेव्हा जग चिंतेत आहे, तेव्हा भारत आशा पसरवत आहे. जागतिक परिस्थिती आणि आव्हानांचा भारतावर परिणाम होत असला तरी येथे सकारात्मकतेची भावना अनुभवता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
'एआय'बाबत पंतप्रधान म्हणाले की हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे आणि जगाचे वर्तमान आणि भविष्य हे एआयशी जोडलेले आहे. भारताला ड्युअल एआय पॉवर, फर्स्ट एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेकंड एआय, एस्पिरेशनल इंडियाचा फायदा आहे. जेव्हा महत्त्वाकांक्षी भारत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शक्ती एकत्र येते तेव्हा विकासाचा वेग वाढणे स्वाभाविक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ भारतासाठी तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी नवीन संधींचे प्रवेशद्वार आहे. या वर्षी इंडिया एआय मिशनच्या शुभारंभाचा उल्लेख करून त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रात एआयचा वापर वाढवण्यावर भर दिला.