जागतिक अशांततेच्या काळात भारत हा आशेचा किरण - पंतप्रधान मोदी

21 Oct 2024 15:54:46
amidst-the-turmoil-in-the-world-india-has-become-a-ray-of-hope


मुंबई : 
     जगातील अशांततेच्या काळात भारत आशेचा किरण बनला असून आशा पसरवत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सरकार गरिबांसाठी ३ कोटी घरे, ९ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि १५ नव्या वंदे भारत एक्सप्रेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होतील, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.




दरम्यान, भारताला एक उदयोन्मुख शक्ती म्हणून वर्णन करतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले, जग अशांततेत असताना भारत आशेचा किरण बनत आशा पसरवत आहे. तसेच, भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकसित होत असून त्याचे प्रमाण अभूतपूर्व आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आजही भारतातील चर्चेचा विषय केंद्रबिंदू आहे.

भारताची स्वतःची चिंता असली तरी प्रत्येकाला भारताबद्दल सकारात्मकतेची भावना आहे. ते म्हणाले, भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. आम्ही गरिबीची आव्हाने देखील समजून घेतो आणि प्रगतीचा मार्ग कसा मोकळा करायचा हे देखील आम्हाला माहीत आहे. आमचे सरकार वेगाने धोरणे बनवत निर्णय घेत नवीन सुधारणा करत आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.






Powered By Sangraha 9.0