तुलसी परत येतेय! १५ वर्षांच्या ब्रेकनंतर स्मृती इराणी करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

    15-Oct-2024
Total Views |
 
smriti irani
 
 
मुंबई : ‘क्युकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हटलं की तुलसी अर्थात अभिनेत्री स्मृती इराणी यांचाच चेहरा समोर येतो. गेल्या काही काळापासून स्मृती इराणी राजकारणात सक्रीय आहेत. पण आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुली यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अनुपमा' मालिकेत त्या महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
नुकतीच अनुपमा या मालिकेने १५ वर्षांचा लीप घेतला आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली. टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, स्मृती इरानी या लीपनंतर मालिकेचा एक भाग असणार आहेत.
 
'अनुपमा'मध्ये रुपालीसोबत स्मृती इराणी विशेष कॅमिओ करणार असल्याचे सांगितले जात आहे. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या 'मणिबेन डॉट कॉम' या कॉमेडी शोमध्ये त्या शेवटच्या दिसल्या होत्या. नंतर त्यांनी 'अमृता' नावाच्या एका बंगाली चित्रपटात काम केले होते.
 
दरम्यान, अनुपमा या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक म्हणजेच स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते? ही मालिका. काही वर्षांपूर्वी ही मालिकासुद्धा लोकप्रिय ठरली होती. मात्र, सध्या या मालिकेची लोकप्रियता कमी झाली असून सध्या ही मालिका दुपारी प्रसारित होते.