राष्ट्राला जागतिक मान्यता मिळाली ती हिंदुत्वाच्या मूल्यांमुळे!

08 Oct 2023 18:24:56
Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat Amritshatham Speech

मुंबई :
"भारताच्या जी-२० शिखर परिषदेत राष्ट्राला जागतिक मान्यता मिळाली ती हिंदुत्वाच्या मूल्यांमुळे. जी सध्या उर्वरित जग प्राप्त करू इच्छित आहे. उर्वरित जग जागतिक बाजारपेठेशी परिचित असले तरी त्यांना जागतिक कुटुंबाच्या संकल्पनेचा फारसा अनुभव नाही. तर दुसरीकडे भारत ३ हजार वर्षांपासून हे वास्तव जगत आला आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केरळ येथे केले. कोझिकोडमध्ये शनिवारी पार पडलेल्या 'अमृतशथम' केसरी व्याख्यानमालेत 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघामागील संघटनात्मक विज्ञान' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विशेषतः भारताच्या संस्कृती आणि समाजाच्या अद्वितीय गुणांवर त्यांनी प्रकाश टाकला.

ते म्हणाले की,"जागतिक संदर्भात 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना जी-२० मध्ये आनंदाने स्वीकारली गेली. कारण हे एक दृश्य आहे जे जागतिक बाजाराच्या पलीकडे जाऊन आपले राष्ट्र हजारो वर्षांपासून जगत असलेली संकल्पना जागतिक कुटुंबात समाविष्ट करते. यामुळे ज्ञान देण्यासाठी हिंदू समाजाने संघटित होणे आवश्यक आहे."

सरसंघचालकांनी यावेळी विविध भाषा, जाती, धर्म, जीवनशैली, इत्यादींसह भारतातील विविधतेवर चर्चा केली. ते म्हणाले, " याबाबतीत मतभेद असले तरी भारताने जीवनाचा एक मार्ग म्हणून विविधता स्वीकारली आहे. सामायिक मूल्ये आणि संस्कारांद्वारे लोकांना एकत्र केले आहे. भारतीयांची हजारो वर्षांपूर्वीचे एक समान वंश, समान डीएनए आणि सामायिक संस्कार आहेत." पुढे त्यांनी देशभक्ती हा भारतातील सर्व धर्म, जाती आणि भाषांमधून चालणारा समान धागा आहे, तर आपला समाज विविधतेचा स्वीकार करण्याच्या अद्वितीय वर्तनाने वैशिष्ट्यीकृत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

संघटित समाजच समृद्ध होतात आणि समृद्ध राष्ट्रासाठी योगदान देतात; त्यामुळे सरसंघचालकांनी हिंदू समाजातील एकतेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, " भारताच्या पूर्वजांनी कधीही इतरांवर विजय मिळवण्याचा किंवा धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी केवळ विद्यमान संस्कृतींमध्ये भर टाकली आणि निर्माण झालेली पोकळी भरून काढली. इतकंच नव्हे तर त्यांनी मन जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले."

समाजाच्या गरजा समजून घेणाऱ्या आणि त्याच्या भल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात संघाची भूमिका सरसंघचालकांनी कार्यक्रमादरम्यान अधोरेखित केली. त्याचप्रमाणे संघटनेचे ध्येय स्वतःच्या फायद्यासाठी नसून देश आणि तेथील लोकांच्या भल्यासाठी आहे, याबाबतही त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0