"शिंदे सुरतला निघाले होते... पण आम्हाला वाटलं जर ऑपरेशन फेल झालं तर कसं व्हायचं?"

09 Jan 2023 16:15:57
 
Girish Mahajan
 
 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हा सत्तांतर कसं घडलं? यावर आत्तापर्यंत अनेक शिंदे गटातील नेत्यांनी किस्सा ऐकवला आहे. दरम्यान, आता जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले, या गोष्टीचा विचार केला की आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र आम्ही ऑपरेशन सुरु केले. हे मिशन वाटते तितके सोप्पे नव्हते. उद्धव ठाकरेंना कंटाळून शिवसेनेसारख्या पक्षातून ४०-५० जण बाहेर पडले. आधी १७-१८ जणांना घेऊन बाहेर पडायचे ठरले, पण नंतर हा आकडा ५० वर गेला, हे खूप कठीण होते."
 
 
"एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतात की किमान ५ तास तरी झोपा. पण, ते पहाटे ३ वाजेपर्यंत काम करत असतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. दुसरीकडे, आपण सर्वांनी बघीतले की अडीच वर्षात ते मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाहीत. घरून काम करतो, कॉम्पुटरवर काम करतो, असेच काम त्यांनी केले." असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकादेखील केली.
 
 
पुढे ते म्हणाले, "यासाठी चांमुंडा मातेचा आशीर्वाद आमच्यापाठी होता. ४० लोकं उद्धवजींना कंटाळून बाहेर पडताहेत हे सोपं नव्हतं. बुडाला लागलो तर समुद्राची लाट येते आणि ढकलून देते. अशीच लाट आली. ही लाट साधीसुधी नव्हती. तर लाट आली अन् थेट शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवून दिलं. ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले." असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0