राऊतांबद्दल बोलणे म्हणजे तोंडाची वाफ गमावणे! फडणवीसांकडून राऊतांचा समाचार

    28-Jul-2022
Total Views |

fadnavis  
 
मुंबई : आमचे सरकार पडणार असा दावा करणारे लोक अतिशय भाबडे आहेत त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे तोंडाची वाफ गमावणे असा टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. आमचे सरकार मजबूत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करत आहोत आणि आमचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असा दावाही फडणवीसांनी केला. राज्यात पुरस्थितीमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे लवकरच पूर्ण करून त्यांना तातडीची मदत दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.
  
 
लोकसभेत काँग्रेसचे जेष्ठनेते अधिररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रूपदी मुर्मू यांच्याबद्दल केले विधान अतिशय निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. राज्यातील ओबीसी आरक्षणसंदर्भता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याबद्दल आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करूच आणि ज्या निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करणार आहे असा दावाही उपमुख्यमंत्र्यांनी केला.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.