जेएसडब्ल्यूच्या 'रायगड मॉडेल'नं २७ हजार गावकऱ्यांना पाणी पोहोचवलं!

    20-Jun-2022
Total Views |

raygad.png
 
 
  
 
 
डोल्वी : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील स्थानिक गावकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या जेएसडब्ल्यू ग्रुपच्या पुढाकाराचा भाग म्हणून जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील नैसर्गिक स्रोतांची पुनःस्थापना व व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. गावकऱ्यांना पाणीपुरवठा सहज उपलब्ध करून देणे आणि या भागातील हरित आच्छादन वाढविणे यावर या उपक्रमांतर्फे भर देण्यात आला आहे. जेएसडब्ल्यूच्या जलसंवर्धन उपक्रमांचा २७,००० स्थानिक रहिवाशांना लाभ झाला आहे.
 
 
 
स्थानिकांना पेयजल व घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध करण्यावर या उपक्रमांमध्ये भर देण्यात आला आहे. कंपनीतर्फे स्थानिकांना ५३,५०० घनमीटर पाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, १४,५०० घनमीटरचे जलसाठे तयार करण्यात आले आहेत आणि स्थानिकांसाठी ६०० घनमीटरचे पेयजलसाठे तयार करण्यात आले आहेत. बंधारे, पर्जन्यजलसंधारण व साठवणूक रचना, सामुदायिक तलावांची पुनःस्थापना व दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम, पेयजलाची जलवाहिनी तयार करणे इत्यादी माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
 
 
कंपनीतर्फे :
 
१. जेएसडब्ल्यू कारखान्याच्या परिसरात असलेल्या ११ ग्रामपंचायतींमधील सुमारे ५० गावांना सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जेएसडब्ल्यू पाटणसई ते जेएसडब्ल्यू डोल्वी कारखान्यापर्यंत नवी २५ किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
२. डोल्वी, निगडे, नारंगी, दादर, रावे, बहिरामकोटक, मोठे वाढव, शिर्की व बोरी येथे सामुदायिक तलावांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कुसुंबळे आणि चोरढे ग्रामपंचायतींमध्ये बंधारे बांधण्यात आले आहेत.
३. साळव येथे पाण्याच्या उन्नत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे आणि संजयनगर येथे जमिनीलगत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. खारेपाटमध्ये (सालिने भाग) पर्जन्यजलसंकलन व साठवणूक बांधकाम करण्यात आले आहे.
४. शिर्की, बोरी, खारढोंबी, शहापूर आणि धेरांड येथे पेयजलवाहिनी बांधण्यात आली आहे.
५. तालुक्यांमधील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरठा करण्यात आला.
६. समुदायातील सदस्यांतर्फे स्वतंत्रपणे जलउपक्रम राबविण्यात यावेत यासाठी २० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्तरीय जल समित्यांची स्थापना करण्यात आली. गावकऱ्यांना सुरक्षित पेयजल उपलब्ध होईल, याची खातरजमा करण्याची जबाबदारी या ग्रामसमित्यांवर असते.
 
 
 
खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पांतर्गत ३१० हेक्टर जमिनीवरील खारफुटींची पुनःस्थापना करण्यात येणार आहे आणि ३१० हेक्टर जमिनीवर हरित आच्छादन वाढविण्याची योजना आहे. जेएसडब्ल्यूने त्यांच्या खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील हरित आच्छादन वाढविले आहे. गेल्या पाच वर्षांत हरित आच्छादन १५ लाख खारफुटीची रोपे लावून, खारफुटी नष्ट झालेली ३१० हेक्टर जमीन पुन्हा एकदा हरित आच्छादनांतर्गत आणली आहे. या खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पात १९५ स्थानिक बचत गटांमधील एकूण २००० महिला सहभागी झाल्या होत्या. यात बहिरामकोटक, घोडबंदर, मंत्रीवाडी, जानवली, ठाकुरबेडी इत्यादी नऊ गावांचा समावेश होता. गेल्या १२ महिन्यांत जेएसडब्ल्यूने ७० हेक्टर जमिनीवर ३५०,००० खारफुटींची पुनःस्थापना केली.
 
 
 
या उपक्रमात १०० बचतगटांमधील १००० महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत वस्तीमधीन २० टन कचऱ्याचे व्यवस्थापन केले जेएसडब्ल्यूतर्फे, घरगुती घनकचरा व्यवस्थापनासाठी स्थानिकांना मदत करण्यासाठी नियमितपणे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. या प्रयत्नांच्या माध्यमातून जेएसडब्ल्यूने शाश्वत मार्गाने आसपासच्या गावांमधील २० टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले आणि याचा या भागातील १७०० कुटुंबांना लाभ झाला आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गजराज सिंग राठोड यांच्यानुसार, “आमच्या कारखान्यात प्रदूषणावर नियंत्रणाच्या प्रयत्नांना या भागातील हरित आच्छादन वाढविण्याच्या प्रयत्नांचे सहाय्य लाभले आहे.
 
 
 
त्याचबरोबर स्थानिकांना घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्थानिकांच्या सहयोगाने आम्ही हे उपक्रम राबवतो. दीर्घकालीन विचार करत या उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी गावकऱ्यांना सहभागी करून घेत, प्रशिक्षण देऊन आणि त्यांना सक्षम करून हे कार्यक्रम राबविण्यात येतात. आमच्या खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पात आसपासच्या गावांतील २००० महिलांचा सहभाग आहे. पाण्याशी संबंधित उपक्रम २० जलसमित्यांतर्फे राबविण्यात येतात. या समित्यांमध्ये ४०० सदस्य आहेत. स्थानिकांशी भागीदारी केल्याने त्यांच्या गरजा नीट समजून घेतल्या जातात आणि जेएसडब्ल्यू त्या परिणामकारकतेने हाताळते.
 
 
 
” जेएसडब्ल्यू फाउंडेशन सीईओ अश्विनी सक्सेना यांच्या मते, “जेएसडब्ल्यूचा एकत्रित जल, नैसर्गिक स्रोत व कचरा व्यवस्थापन कार्यक्रम सहयोगात्मक विकासाला आणि जल, जमीन व संबंधित स्रोतांचे व्यवस्थापनास चालना देतो. आर्थिक व सामाजिक कल्याण साधण्याच्या उद्दिष्टाने हे कार्यक्रम राबविण्यात येतात. असे करताना महत्त्वाच्या परिसंस्थेबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड न करता हे साध्य करण्यात येते. गाव आणि समुदायाशी संबंधित उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी आणि स्थानिक उपजीविकेच्या संधींशी पाणी आणि परिसंस्था पुनर्संचयित करण्यात समुदायाच्या सक्रिय सहभागाला प्राधान्य दिले आहे.”
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.