ठाण्यात आढळला तस्कर' जातीचा दुर्मिळ अलबिनो साप

    17-Oct-2022
Total Views | 115
 
 
 
सर्पमित्र व प्राणीमित्रांनी केली दुर्मिळ अलबिनो जातीच्या सर्पाची सूटका


ठाणे: ठाण्यातील सर्पमित्र किशोर साळवी यांनी एका "तस्कर’’’ जातीच्या (दुर्मिळ अलबिनो) सर्पाची सुटका केली. तस्कर हा भारतात आढळणारा बिनविषारी सर्प असुन त्याचे रंगरूप लोभस असते.या सर्पाला जीवदान देऊन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.अशी माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे प्राणीमित्र पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी दिली.
 
कळवा पारसिकनगर येथील गॅलक्सी टॉवर समोरील भंगारवाल्याच्या दुकानात हा दुर्मिळ साप आढळल्याची माहिती मिळताच जीवोहम चॅरिटीजचे सभासद सर्पमित्र साळवी यांनी ताकाळ धाव घेत सापाची सूटका केली. पशुवैद्यक डॉ. किरण शेलार यांनी सापाची सुदृढता तपासून त्याला वनअधिकारी संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे जीवोहमचे अध्यक्ष चंद्रकांत कंग्राळकर यांनी सांगितले. अश्या प्रकारचे सर्प क्वचित पाहण्यास मिळतात. असे साप रेस्क्यु करणे ही सर्पमित्रांसाठी पर्वणीच असते.असेही कंग्राळकर यांनी यावेळी सांगितले.
 
निसर्गाचा अदभुत अविष्कार असलेला 'तस्कर'
 
                      ‌‌            
 ‌  तस्कर (Trinket snake) हा भारतात आढळणारा  निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट स्नेक म्हणतात, रेस्क्यू केलेल्या अलबिनो सापाची लांबी साधारणपणे १ फुट आहे. रंगद्रव्य (मेलॅनिन) च्या कमतरतेमुळे इतर सापांपेक्षा हा वेगळा दिसतो. रंगहीन असल्यामुळे त्याला अलबिनो असे म्हणतात. सरडे, पाली, उंदीर हे त्यांचे खाद्य आहे.निसर्गाने सापाच्या शरीरावर केलेली नानाविध रंगांची उधळण अदभुत आहे. त्यामुळे,या सापांना निसर्गात बेमालूमपणे मिसळून शिकार करता येते.शिवाय स्वतःचा बचाव देखील करता येेतो.तस्कर साप दुर्मिळ असल्याने क्वचितच आढळतात त्यामुळे अश्या सापांचे संरक्षण व संगोपन होऊन त्यांचे जतन होणे गरजेचे आहे.
 

- ज्ञानेश्वर शिरसाठ, प्राणीमित्र पोलीस 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिटी झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या..

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121