मुंबई : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला असला तरी यानंतर महविकास आघाडीच्या नेत्यांमधील खातेवाटपासाठीची नाराजी समोर आली. परंतु या विस्तारानंतर मंत्री पदाची शपथ घेऊनही पाहिजे ते की खाते न मिळाल्याच्या कारणावरून शिवसेनेचे अब्दुल सत्तर यांनी राजीनामा दिला. शिवसेनेने जरी याबाबत बोलणे टाळले असेल तरीही या राजीनाम्यामुळे भाजपसाठी मात्र हा सुखद धक्का आहे..सत्तारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'ही पहिली बातमी आहे. अशा आता अनेक बातम्या आता येतील.'