'कबर नका हटवू, पण...'; आठवलेंनी नेमका कोणता उपाय सांगितला?

    24-Mar-2025   
Total Views | 51

Ramdas Athawale on Aurangzeb Tomb

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramdas Athawale on Aurangzeb Tomb)
"औरंगजेबाची कबर हटवण्याने कोणताही तोडगा निघणार नाही. त्याऐवजी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारा"; असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. डेहराडून येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी औरंग्याच्या कबरीवरून होत असलेल्या वादात आपली भूमिका मांडली आहे.

हे वाचलंत का? : रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांवर होणार कारवाई!

राज्यातील मुस्लिम बांधवांना आवाहन करत ते म्हणाले, कोणीही औरंगजेबाशी आपला संबंध जोडू नका. भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाचे वंशज नाही, त्यांचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. औरंगजेबाची कबर काढून न टाकता, छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारता येईल का, याचा विचार करावा. आपल्याला संभाजी महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जायचे आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121