राष्ट्रसमृद्धीसाठी पंचपरिवर्तनाचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक : माननीय शांताक्का

    24-Feb-2025
Total Views |

Rashtra Sevika Samiti Guwahati Baithak

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mananiya Shantakka on Panchaparivartan)
"विश्वकल्याणाची आकांक्षा उराशी बाळगणारी हिंदू जीवनशैली आचरणाची बाब आहे, म्हणून आपण सर्वांनी ती आपल्या जीवनात आत्मसात केली पाहिजे. आपले राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर आपल्याला पंचपरिवर्तनाचे विषय वैयक्तिक जीवनात आणि आचरणात आणून समाजापर्यंत पोहोचवावे लागतील.", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले.

राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय कार्यकारिणी एवं प्रतिनिधी मंडलाची द्वितीय अर्धवार्षिक बैठक रविवार, दि. २३ फेब्रुवारी संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आयआयटी कॅम्पस, गुवाहाटी येथे झालेल्या तीन दिवसीय बैठकीत भारतातील ३२ राज्यांतील १०८ प्रतिनिधी उपस्थित होते.

हे वाचलंत का? : 'भारतीय किसान संघ'च्या अधिवेशनात दोन महत्त्वाचे ठराव पारित!

 समितिच्या प्रमुख कार्यवाहिका सीताक्का यांनी बैठकीत संस्थेची सद्यस्थिती, संपन्न झालेले विशेष कार्यक्रम आणि भविष्यातील नियोजित कार्यांची तसेच योजनांची माहिती दिली. त्यासाठी दर्जेदार काम वाढवावे लागेल, असे त्या म्हणाल्या. तसेच संत नामदेवांचे ६७५ वे स्मृती वर्ष, राणी दुर्गावती यांची ५०१ वी जयंती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती लक्षात घेऊन या सर्वांचे प्रेरणादायी जीवन चरित्र लोकांसमोर मांडायचे आहे आणि त्यांचे विचार आपल्या जीवनातही अंगीकारायचे असल्याचे त्यांनी सांगितले.


Rashtra Sevika Samiti Guwahati Baithak

देशभरात १७९९ सेवाकार्ये
या बैठकीत ३४ प्रांतातील १०८ प्रतिनिधी उपस्थित होते. सेविका समितीच्या ४१२५ शाखा देशातील सर्व १२ प्रदेश आणि ३८ प्रांतांमध्ये कार्यरत आहेत. एकूण १०४२ जिल्ह्यांपैकी ८३४ जिल्ह्यांमध्ये समितीचे काम आहे. देशभरात समितीच्या महिला कार्यकर्त्यांमार्फत १७९९ सेवाकार्ये चालवली जात आहेत.