भारतातील पाकिस्तान वसाहतीचे 'भागीरथ' असे नामांतरण

स्थानिक प्रशानाचा मोठा निर्णय

    01-Feb-2025
Total Views | 306
 
Bhagirath colony
 
अमरावती (Bhagirath colony) : आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा या जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून पाकिस्तान नावाची एक वसाहत आहे. मात्र आता त्या पाकिस्तान वसाहतीचे नामांतरण करण्यात आले आहे. तिचे नामांतरण करून भागीरथ कॉलनी असे नामांतरण केले. अनेक वर्षांपासून या वसाहतीचे नामांतरण कसे होईल अशी मागणी केली जात होती. मात्र आता त्यावर स्थानिक प्रशासनाने भागीरथ असे नामांतरण करत शिक्कामोर्तब केला आहे.
 
महापालिकेच्या अधिनियमनाच्या कलम ४१८ अन्वये अधिकाऱ्यांनी वसाहतीचे नाव बदलले आहे. नाव बदलल्यानंतर स्थानिक लोकांच्या ओळखपत्रांवरील म्हणजेच आधारकार्डवरील रहिवाशांचे पत्ते बदलण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमानुसार ६० जणांनी आपल्या आधारकार्डमधील पत्ते बदलले आहेत. नामांतर केल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
१९७१ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. त्यावेळी भारताचा विजय झाला होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश झाला होता. तत्कालीन परिस्थितीत अनेक निर्वासितांनी  भारतात वास्तव्य केले होते. तत्कालीन भारत सरकारने बेघर असलेल्यांना तसेच देशातील काही ठिकाणी वास्तव करणाऱ्यांची मदत केली.
 
विजयवाडामध्ये एका ठिकाणी निर्वासितांचे वास्तव्य होते. लोकांनी या वसाहतीला पाकिस्तान असे नाव दिले होते. तेव्हापासून ते लोक त्याला पाकिस्तान असे संबोधू लागले होते. त्यामुळे संबंधित वस्तीला पाकिस्तान अशा नावाने ओळखू निर्माण झाली होती. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर आता महापालिकेने याची दखल घेत वसाहतीचे नाव नामांतरण केले आहे. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121