फणिगिरीला उत्खननात सापडला ३७०० नाण्यांचा साठा!

    06-Apr-2024
Total Views | 95
 
fanasgiri
 
मुंबई : पुरातत्व शास्त्राचा वापर करून भारतात अनेक ठिकाणी संशोधन सुरु असते. अशातच तेलंगणा राज्यात फणिगिरी नावाची महत्वाची बौध्द पुरातत्वीय साईट आहे. येथे आता पर्यंत अनेक वेळा उत्खनन झाले व काही उत्खननांचे रिपोर्ट सुद्धा प्रकाशित आहेत. येतच आजही उत्खनन सुरु आहे. याबाबत पुरातत्व अभ्यासक आशुतोष बापट यान्नीफेसबक पोस्ट करून धन भरलेल्या मोहोरांचा घडा मिळाल्याची माहिती दली आहे.
 
आशुतोष लिहितात, "निजाम काळापासुन या जागेचे संरक्षण होणे सुरु झाले, इ.स. १९४१ ते १९४४ दरम्यान पहिल्यांदा या ठीकाणी खाजा महमद अहमद यांनी उत्खनन केले. नुकताच या ठीकाणी एका भांड्यात इक्श्वाकु काळातील जवळपास ३७०० नाण्यांचा साठा सापडला. आजच्या आंध्र- तेलंगणा भागात इ. स. तिसऱ्या- चौथ्या शतकात इक्श्वाकु राजवंशाने राज्य केले होते. साधारणतः सातवाहन साम्राज्याचा ह्रास होत असतांना इक्श्वाकु राजवंशाची स्थापना होउन वाढ झाली. या राजांनी लिड या धातुमधे आपली नाणी टंकीत केली होती. फणिगीरी ला उत्खननात आता सापडलेली ३७००+ नाणी देखील लिड चीच आहेत. हि नाणी एका मातीच्या भांड्यात पुरलेली होती. बाहेर काढुन मोजली तर एकुण ३७३० नाणी या भांड्यात होती. या प्रत्येक नाण्याचे वजन हे साधारण २.३ ग्राम च्या आसपास आहे. इक्श्वाकु नाण्यांवर पुढील बाजुला हत्ती व मागील बाजुला उजैनी चिन्ह असते. या पुर्वी फणिगिरी ला झालेल्या उत्खननातही अशी नाणी सापडलेली आहेत पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडली नव्हती."
 
ते पुढे म्हणतात, "येथे यापुर्वी झालेल्या उत्खननात अनेक विविध वस्तु सापडल्या जसे विविध दगडाचे मणी, काच, बांगड्यांचे तुकडे, विविध शिल्प, खिळे आणि बरंच काही, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला हा नाण्यांचा साठा म्हणजे एक महत्वाचा शोध म्हणावा लागेल."
अग्रलेख
जरुर वाचा
सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..