पाकिस्तानचा नतद्रष्टपणा

    14-Apr-2024
Total Views | 55
pakistan
देश पुरता रसातळाला गेला, तरी पाकिस्तानची हेकडी कायम आहे. स्वतःच्या गुर्मीत राहणार्या पाकला द्वेषाच्या राजकारणाशिवाय दुसरे काही सुचेल तरी कसे म्हणा? स्वतंत्र मुस्लीम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली खरी, पण तरीही त्याठिकाणी हिंदू संस्कृतीच होती. फाळणीनंतर बदलत्या स्थितीमुळे पाकिस्तानमध्ये हिंदूंची गळचेपी सुरू झाली. आता तर पाकिस्तानमध्ये हिंदू फार कमी प्रमाणात राहिले आहेत. सर्वधर्मसमभाव हा शब्द पाकिस्तानात तसा हास्याचाच विषय म्हणावा लागेल.
 
पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, नव्हे, तर ती कमी कशी होईल, यासाठी थेट पाकिस्तानी सत्ताधार्यांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंची संख्या घटण्याबरोबरच तेथील हिंदू अस्मितेची प्रतीकेही जमीनदोस्त करण्याचा सपाटा सुरू आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू आणि त्यासंबंधी कोणतीही गोष्ट शिल्लक राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी पाकिस्तान सरकारदेखील पुढाकार घेत आहे. नुकतेच पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक हिंदू मंदिर तोडण्यात आले. हे मंदिर तोडून आता त्या जागेवर मोठा मॉल उभा केला जाणार आहे. मागील सात दशकांपासून बंद असलेले हे हिंदू मंदिर तोडण्यासाठी पाक सरकारनेच परवानगी दिली होती.
 
खैबर पख्तूनख्वामध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ लंडी कोटल शहरात हे हिंदू मंदिर होते. शहरातील बाजारात असलेले हे मंदिर १९४७ पासून निर्मनुष्य होते. यावरूनच अंदाज येतो की, इथे हिंदूंच्या मनात किती दहशत पसरवली असेल की, ते मंदिरात पूजा-अर्चना करायलाही जाऊ शकत नव्हते. नुकतेच युएईमध्ये भव्य हिंदू मंदिर उभे राहिले. ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जगभरात ठिकठिकाणी हिंदू मंदिरे उभी राहत असताना नतद्रष्ट पाकला मंदिर उभे करणे, तर दूरच पण आहे ती हिंदू मंदिरे सांभाळणेही जड झाले आहे.
 
१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर मोठ्या संख्येने हिंदू भारतात वास्तव्यास आले होते. फार अल्प प्रमाणात हिंदू या ठिकाणी राहिले. फाळणीनंतर हे मंदिर दर्शनासाठी, पूजेसाठी बंद करण्यात आले होते. १९९२ साली काही कट्टरपंथीयांनी मंदिरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मंदिराचा एक भाग तोडण्यात आला. अशा स्थितीमध्ये पाकिस्तान सरकारने मंदिराकडे दुर्लक्ष केले. मंदिराच्या संरक्षणासाठी व पुनर्निर्माणासाठी कोणतीही पावले उचलली नाही आणि आता तर हे अतिप्राचीन हिंदू मंदिर तोडण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने दिली आहे.
 
या मंदिराच्या जागेवर मोठा मॉल उभारण्यास काहीही हरकत नाही, अशी भूमिका पाक सरकारने घेतली आहे. या ठिकाणी हिंदू मंदिर होते हे मान्य करण्यासही पाक सरकार तयार नाही. दरम्यान, मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी वक्फ बोर्डाची आहे. मात्र, याठिकाणी या बोर्डाचे ना कार्यालय आहे ना कुठले कर्मचारी. पाकिस्तान हिंदू मॅनेजमेंट कमिटीचे हारून सरब्दियाल यांनी सांगितले की, मंदिर संरक्षणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची होती. मात्र, ही जबाबदारी पार पाडण्यात आली नाही. जर असेच होत राहिले, तर सगळी हिंदू मंदिरे जमीनदोस्त होतील.
 
चीनच्या कर्जाच्या बोझ्याखाली पाक दबत चालला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान सध्या तुरुंगात आहे. पाकिस्तानी सैन्याचा सरकारमधील हस्तक्षेप वाढतोय. जागतिक स्तरावरदेखील नाचक्की होण्याशिवाय दुसरे काहीही हाती लागतं नाहीये. त्यातच भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवात हिंदू मंदिर पाडून पाक सरकार मिठाचा खडा तर टाकत नाही ना असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. इमरान खान सध्या तुरुंगात असून त्यांच्या समर्थकांनी अपक्ष उभे राहूनही ९० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे भेदरलेल्या शरीफ बंधूंनी कडबोळ्याचे सरकार स्थापन केले. पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार ही काही नवी गोष्ट नाही. फाळणी झाल्यापासूनच पाकिस्तानमध्ये हिंदू भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळेच मोदी सरकारने आणलेल्या ‘सीएए’ कायद्याचे पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंनी स्वागत केले आहे.
 
 
७०५८५८९७६७
अग्रलेख
जरुर वाचा
आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत

आता महिला-युवतींची छेडछाड करणाऱ्यांना सुट्टी नाही, मुख्यमंत्री रेखा गुप्तांचा दिल्लीत 'शिष्टाचार पथक' फॉर्म्युला

Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर ..

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय...

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, "बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय..."

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. Supriya Sule on Aurangzeb Kabar..