बारामती लोकसभा लढवणारच! विजय शिवतारेंचा निश्चय ठाम

    13-Mar-2024
Total Views | 54

Vijay Shivtare


पुणे :
केवळ पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागृत करुन आपण लढायला हवं, असे म्हणत शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून लोकसभा निवडणुक लढवण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
 
दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणत्याही कुटुंबाचा सातबारा नाही असे म्हणत त्यांनी दोन्ही पवारांवर टीका केली. दरम्यान, आता त्यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे वाचलंत का? - CAA विरोधातही ओकली उद्धव ठाकरेंनी गरळ!
 
विजय शिवतारे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही तसेच साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार आहे. एका शब्दात सांगायचं झाल्यास ही लढाई पवार विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस अशी असेल."
 
"बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नेते यांनी एकमताने ठराव पास केला असून विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. ही लढाई विजय शिवतारेंची नसून लोकांची लढाई लढण्यासाठी आणि प्रस्थापितांच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आहे. यासाठीच मी ही लढाई लढणार आहे. या लढाईत निश्चितपणे जनता मला मोठ्या प्रमाणात आशिर्वाद देईल. मी महायुतीच्या विरोधात नाही. परंतू, इथली लढाई वेगळी आहे. त्यामुळे लोकांची ईच्छा आहे की, मी ही लढाई लढावी," असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..