जी-20 परिषदेत चमकल्या नक्षलग्रस्त 'बस्तर'च्या महिला; परदेशी पाहुण्यांनीही घेतली दखल

    10-Sep-2023
Total Views | 116

Millet mission

दिल्ली : नुकतीच ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जी-20 बैठक पार पडली. यात अनेक देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. जी-20 परिषदेदरम्यान, भारतीय संस्कृती, कला, खानपान, पोशाख इत्यादी अनेक गोष्टींची परदेशी पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली.
 
यात 'मिलेट मिशन'वर विशेष लक्ष देण्यात आले. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीही उपस्थित झाल्या होत्या. त्यांना ९ सप्टेंबर रोजी पुसा रोडवरील IARI संकुलात कृषी प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडमध्ये बनवल्या जाणार्‍या उत्पादनांची मनसोक्त खरेदी केली.
 
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील महिलांनी भडधान्यांपासून अनेक पदार्थ बनवले होते. परदेशी पाहुण्यांना हे पदार्थ खूप आवडले. बस्तर जिल्ह्यातील एका महिलेने सांगितले की, तिने भडधान्यांचे लाडू, नाचणीचे कुकीज, नाचणीची चकली, कोदो-कुटकी इत्यादी पदार्थ तयार केले आहेत.
 
तसेच ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट लेडीला भडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांची टोपली भेट दिली असल्याचेही तिने सांगितले. छत्तीसगड कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्तीसगड कृषी विभागाने पुसा येथे एक स्टॉल देखील लावला होता. या स्टॉलमध्ये बांबूपासून बनवलेले सुप, टोपली, छत्री यांसह भडधान्यांपासून बनवलेली उत्पादनेही ठेवण्यात आली होती.




अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121