मागील ४० वर्षात एकदाही महापालिकेकडून नालेसफाई नाही

विक्रोळीतील नागरिकांचा पालिकेविरोधात आक्रोश

Total Views | 90

vikroli





मुंबई:
विक्रोळी पार्कसाईट परिसरातील वर्षानगरमधील डोंगरावरील वस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाणी तुंबण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार असल्याने पालिकेच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.




स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता वस्तीवरील ज्येष्ठ महिला सुंदराबाई गायकवाड म्हणाल्या, "गेली ५० वर्षे आम्ही इथे राहतो आहोत. या झोपडपट्टीत वर्षानुवर्षे आम्हाला या गटारांचा त्रास आहे. पावसाळ्यात पाणी भरतं, गटारीचे पाणी आमच्या घरात येतं. महापालिकेचे लोक कधीही इथे साफसफाई करायला वरती येत नाहीत. आम्ही सर्व लोक मिळून सणाला बाहेरून माणसं बोलवून साफसफाई करून घेतो.



स्थानिक नागरिक संदीप पाखरे सांगतात, ३५ वर्षांपासून मी इथे रहातोय. या ३५ वर्षात एकदाही मी या गटारीचे काम झाल्याचे पाहिलं नाहीये. अनेक योजना येतात. दत्तकवस्ती योजना होती. कोणीही इथे फिरकत नाही. दत्तकवस्ती योजनेअंतर्गत ७० कामगार असल्याची माहिती मला देण्यात आली. मात्र वस्तीवर १० लोक देखील काम करत नाहीत. या गटारांचे पाणी पावसाळ्यात थेट घरात शिरते. आमची लहान लहान मुलं आहेत. ते वारंवार आजारी पडतात मात्र कोणालाही आमच्या जीवाची काही पडलेली नाहीये. आम्ही तक्रारी करूनही पालिकेचे लोक येत नाहीत. १५-२० दिवस गटारातील कचरा असच पासून राहतो," अशी व्यथा पाखरे यांनी मांडली.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121