वीजबिलांची वसुली कमी झालेल्या ठिकाणी ‘लोडशेडिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2022
Total Views |

nitin
 
 
 
मुंबई: ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी राज्यात ‘लोडशेडिंग’बाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, “जिथे वीजबिलांची वसुली कमी झाली आहे तिथे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात होणार आहे. वीज आणि कोळशाच्या टंचाईमुळे ‘लोडशेडिंग’ला सुरुवात होणार आहे. देशात विजेची टंचाई वाढलेली आहे. नऊ राज्यांमध्ये ‘लोडशेडिंग’ वाढले आहे.
 
 
 
 
कोळसा मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवले आहे. मात्र, यामध्ये केंद्राची चुकी आहे. ‘अदानी पॉवर’ने काही प्रमाणात वीज कमी केली. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. त्यामुळे हा ताण वाढला आहे. १५०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली, तर तत्काळ भारनियमन थांबेल,” असेे ते म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..