मुंबईत मराठी माणसावर बेघर होण्याची वेळ !

जन्मापासून मुंबईचे रहिवासी ; आता बेघर होण्याची वेळ : प्रभादेवीतील नागरिकांची व्यथा

    17-Feb-2022   
Total Views | 113

mumbai
 
 
 
 
मुंबई : मराठी माणसांचे हक्काचे शहर समजल्या जाणाऱ्या मुंबईत आता मराठी माणसांनाच बेघर व्हायची वेळ आली आहे. मुंबईचे मूळ समजल्या जाणाऱ्या भागांपैकी एक अशा प्रभादेवी परिसरातील काही मराठी कुटुंबं मागील अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. प्रभादेवी परिसरातील मिठवाला चाळ रहिवाशांना काही कारणांमुळे पुनर्विकासात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चार कुटुंबांवर अक्षरशः बेघर होण्याची वेळ आली आहे. या प्रश्नी संबंधित कुटुंबांनी नुकताच 'दै. मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
 
२८ वर्षांपासून पाठपुरावा ; अद्याप यश नाही !
'आमची घरे प्रशासनाने आखून दिलेल्या सीमेच्या काही अंतर आत आणि काही अंतर बाहेर आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे तांत्रिक कारणे आणि नियम पुढे करत आम्हाला अपात्र ठरविण्यात आले आहे. आम्ही याच मिठवाला चाळीचे रहिवासी आहोत, मात्र आम्हाला इथून काढण्याचे प्रकार होत आहेत. १९९४ पासून म्हणजेच मागील २८ वर्षांपासून या प्रकरणी आम्ही 'म्हाडा' आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र त्याला कुठलेही यश आलेले नाही.'
- उमेश गंगनाईक, स्थानिक रहिवासी,वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
'म्हाडा'च्या निर्णयाकडे आमचे लक्ष !
'आम्ही मागील ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणचे रहिवासी आहोत. जर चाळीचा पुनर्विकास होत असेल तर त्यात आमचा समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे. आम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित प्रशासन आणि इमारतीचे मुख्य प्रवर्तक यांचेकडे सुपूर्द केलेले आहेत. प्रवर्तकांनी आम्हाला प्रकल्पात समाविष्ट करण्याची हमी दिलेली आहे, पण अद्याप त्याला 'म्हाडा'तर्फे परवानगी मिळालेली नाही. आम्ही याचा पाठपुरावा करत राहणार आहोत.'
- महेश आर्य, स्थानिक रहिवासी,वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू..!!
'आम्ही म्हाडाकडे याबाबत सातत्याने संपर्क साधत आहोत. इमारतीच्या मुख्य प्रवर्तकांनी देखील या कुटुंबाना आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पात सहभागी करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही संबंधित कुटुंबांवर अन्याय होऊ देणार नाहीत अशी आमची भूमिका आहे. जर या कुटुंबाना अपात्र ठरविण्यात आले तर त्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. जर रस्त्यावरील लोकांना घरे दिले जाऊ शकतात तर ता अधिकृत रहिवाशांना घरे देण्यात काय अडचण आहे. पीडित कुटुंबाना या प्रकल्पात सहभागी करून घेतले नाही, तर त्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल.'
उमेश गावडे, मनसे शाखाध्यक्ष, वॉर्ड क्रमांक १९४
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...