मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने ?

मंगळवारी १० हजार ८६० नवे कोरोनाबाधित

    05-Jan-2022   
Total Views | 103
 
corona
 
 
 
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी आकडेवारी मागील काही दिवसांपासून मुंबईकरांचे टेन्शन वाढवताना दिसून येत आहे. मंगळवार, दि. ४ जानेवारी रोजी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात अकरा हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णांची करण्यात आली आहे. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
मुंबईत मंगळवारी सुमारे १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत असून २ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, ६५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ५२ हजार ०१२ वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत सध्या ४७,४७६ रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर ११० दिवसांपर्यंत खाली येऊन ठेपला आहे.
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..