मुंबईकरांना दिलासा ; कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम

सोमवारी ५,९५६ रुग्णांची नोंद

    17-Jan-2022   
Total Views | 86
 
corona
 
 
 
मुंबई : मागील काही दिवसांपासून अस्थिरतेच्या टप्प्यावर असलेली मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत चालली आहे. बुधवार, दि. १२ जानेवारीपासून घटत जाणारी रुग्णसंख्या सोमवार, दि. १७ जानेवारी रोजी थेट ६ हजारापर्यंत येऊन ठेपली आहे. दरम्यान, मुंबईतील कमी होत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकर आणि पालिका प्रशासन मात्र सुटकेचा निःश्वास टाकत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
सोमवारी शहरात एकूण ५ हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची सध्याची संख्या सुमारे ५०,७५७ इतकी आहे. सोमवारी मुंबईत बारा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी मुंबईत सुमारे १५ हजार ५५१ बाधितांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याने मुंबईतील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ३५ हजार ९३४ वर पोहचली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर ५५ दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण ४७ इमारती सील केल्या आहेत.
 
 
ऑक्सिजन बेडवर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची सोमवारची संख्या : ४५
उपलब्ध आयसीयू बेड्सची संख्या : ३,१७६
उपलब्ध व्हेंटीलेटर्सची संख्या : १,५७३
उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या : १२,२८२
मुंबईतील एकूण चाचण्या : १,४६,७०,१०४
१७ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चाचण्या : ४७,५७४

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..