तामिळनाडू सरकारने पाडले हिंदू मंदिर

३० एकर जमीन ख्रिश्चन मिशनर्‍यांना हस्तांतरित

    11-Jan-2022
Total Views |

temple
 
 
नवी दिल्ली : एकीकडे काही राज्ये ख्रिश्चन मिशनर्‍यांना रोखण्यासाठी नवनवीन नियम, कायदे आखत आहेत, तर दुसरीकडे तामिळनाडू सरकार मात्र हिंदू मंदिरांना नष्ट करण्याच्या मागे लागल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. जयमकोंदनमधील रेताई पिल्लैर (गणपती) मंदिर तामिळनाडू सरकारने पाडले. या मंदिराच्या मालकीची ३० एकर जमीन आहे. पाडल्यानंतर लगेचच, सरकारने ही संपूर्ण जमीन मिशनऱ्यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने केवळ जमीनच काढून घेतली नाही तर मंदिर चर्चच्या जमिनीवर असल्याचेही सांगितले.
 
 
सोमवारी मुदिचूरमधील वरधराजपुरममधील अड्यारजवळील हिंदू मंदिर महसूल अधिकार्‍यांनी पोलिसांच्या मदतीने पाडले. अतिक्रमणाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला. या बांधकामाला भाविकांनी आक्षेप घेत निदर्शने केली होती. यावेळी मंदिराचे ट्रस्टी रमणिकन यांनी सांगितले की, 'हे मंदिर गेल्या १२ वर्षांपासून आहे. यासाठी अनेक स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मंदिरासाठी जमिनी दिल्या आहेत.' सध्या अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडली जात आहेत. यावर ते म्हणतात की, "हो, आम्हाला हे मंदिर पुन्हा बांधण्याचे वचन देतात, पण ते किती पाळतात हे अनेकांना माहिती आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121