कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन ४० गाड्यारेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे

    23-Jul-2021
Total Views | 99

raosaheb danve_1 &nb

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण आणि राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकणात अतिवृष्टी झाल्याने कोकणवासियांचे बरेच नुकसान झाले आहे. अशात मुंबई आणि कोकणात रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. या अनुषंगाने कोकणातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा पुर्ववत करण्यासाठी आणि कोकणवासियांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, असे दानवे म्हणाले.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पावसाचे पाणी रूळावर साचल्याने काही भागातील रेल्वे वाहतूक थांबली आहे. अशात प्रवाशांची गैरसोय होवू नये याकरिता कसारा, बदलापूर आणि इगतपूरीवरून रेल्वे विभागाकडून प्रवाशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पुरामुळे रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना सर्वप्रथम सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम रेल्वे प्रशासन करेल.
प्रशासनाला पुर्ण खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. धोका पत्करून आणि भावनेच्या आहारी जावून रेल्वे प्रशासन कुठलाही निर्णय घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारे केंद्राकडे पाठवला तर, केंद्र सरकार नक्कीच त्यावर विचार करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या अतिरिक्त ४० फेऱ्या
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत यंदा गणेश उत्सवादरम्यान चाकरमान्यांसाठी मुंबईवरून विशेष गाड्यांच्या ७२ फेऱ्या केल्या जातील. मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पुनम महाजन तसेच आमदार आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर अतिरिक्त ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजून गरज पडल्यास रेल्वे प्रशासन यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाणार जाईल, असे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

( India-Pakistan Updates) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने ..

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पहलगाम इस्लामिक दहशतवाही हल्ल्याचा बदला म्हणून सुरु केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे. बुधवार रात्री पासून चालू असलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तीन हवाई तळांवर (सुकूर, रफिकी, रहिम यार खान) भारताने हल्ला केल्याचे निदर्शनास येत असून रावळपिंडीच्या चकवाल जिल्ह्यातील चकलाला आणि मुरीद तर झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील नूर खान एअरबेसवर हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवल्याचे पाहायला मिळतेय...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121