लसीकरण वाढविण्यासाठी पालिकेचा निर्णय

मुंबईत रात्रीचे लसीकरण सुरू होणार

    15-Dec-2021   
Total Views | 83
 
vaccine-8_1  H
 
 
 
मुंबई : राज्यासह मुंबईतील वाढत्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या आणि इतर बाबींचे गांभीर्य पाहता मुंबई महापालिका प्रशासनातर्फ़े मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील लसावंतांची संख्या वाढविण्यासाठी मुंबईमध्ये लवकरच संध्याकाळच्या टप्प्यात लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. संध्याकाळी पाच ते रात्री अकरा या कालावधीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून ही लसीकरण केंद्रे मुख्यत्वे रेल्वे स्थानक परिसरात उभारली जातील. सद्यस्थितीत ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत.
 
 
देशभरात झालेल्या विक्रमी लसीकरणांनंतर बाकी राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सरकारतर्फे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईत रात्रीच्या वेळीचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण ..

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

( Maharashtra State Rural Improvement Mission honored in 100day office improvement program ) १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121