‘पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यायला हवा..’ लॉकडाऊनवर अनुराग कश्यप पुन्हा बरळला!

    02-May-2020
Total Views | 41

Anurag Kashyap_1 &nb



लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने अनुरागची सरकारवर टीका


मुंबई : देशभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र हा टप्पा पूर्ण होताच ४ मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याची नवीन घोषणा केली. या निर्णयानंतर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केंद्र सरकारवर टीका केली आहे.


‘लॉकडाउन असाच सुरु राहणार आहे, हे थांबणार नाहीयेत. सरकारकडे कोणतीही योजना नाही, कोणताही आराखडा नाही, आणि तितकी आर्थिक क्षमताही नाही. या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष,अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, कॉर्पोरेटर्स या सगळ्यांनी एकत्र येऊन या समस्येवर मार्ग काढला पाहिजे आणि या सगळ्यावर पंतप्रधानांनी मार्ग काढला पाहिजे’, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.





दरम्यान, अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.देशभरात सध्या कोरोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे.या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र सध्या घडलेल्या इतक्या गोष्टींवर अनुरागने मौन बाळगले होते. लॉकडाऊन हा देशहितासाठी असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121