डेंगी, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती आढळल्यास कारवाई

    19-Jun-2019
Total Views |



नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांची विधानपरिषदेमध्ये माहिती


मुंबई : मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सूरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी महानगरपालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपाययोजना केल्या जात आहेत. या तपासणीदरम्यान शासकीय प्रकल्प किंवा खासगी प्रकल्‍पाच्या ठिकाणी रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांविरूध्द कारवाई करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

 

मुंबईतील मेट्रो प्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी गढूळ पाण्यामुळे आजार पसरविणाऱ्या डासांच्या उत्पत्तीबाबत सदस्यांनी उपस्थ‍ित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सागर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एजन्सीने डास प्रतिबंधाच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएनेही स्वतंत्र यंत्रणा नेमली आहे. त्यांच्यामार्फत मलेरिया व डेंगी आजाराच्या रूग्णांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत असून महापालिकेच्या इतर विभागांशी समन्वयाने वस्तीपातळीवर साथीच्या आजाराच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या चर्चेमध्ये शरद रणपिसे, भाई गिरकर, हेंमत टकले, रामहरी रुपनवर आणि विद्या चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121