२६/११नंतर भारतीय वायुसेना प्रत्युत्तर देण्यास तयार होती, युपीए सरकारने नाकारली परवानगी : धनोआ

    28-Dec-2019
Total Views | 175


chief marshel_1 &nbs


मुंबई : 'पाकिस्तानमध्ये अतिरेकी छावण्या कोठे आहेत हे आम्हाला माहित होते आणि आम्ही तयार होतो. पण हल्ला करायचा की नाही करायचा हा एक राजकीय निर्णय होता.२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हवाई हल्ला (हवाई हल्ला) करण्याचा प्रस्ताव तत्कालीन केंद्र सरकारने फेटाळून लावला होता.' असे विधान शुक्रवारी व्हीजेटीआयच्या टेक्नोव्हांझाच्या वार्षिक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या गटाला संबोधित करताना माजी हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी केले.


एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार ते म्हणाले की
, "डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानविरोधात दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव दिला होता. जो मान्य केला गेला नाही. आपल्या लोकांमध्ये भारताकडून धोका निर्माण होण्याची भीती पाकिस्तानने कायम राखली आहे."



माजी एअर चीफ मार्शल म्हणाले की
,"जर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली असती तर पाकिस्तानने त्यांचे अनेक विशेषाधिकार गमावले असते. काश्मीरचा मुद्दा मुद्दाम पाकिस्तान तापत ठेवतो. त्यांच्या मते पाकिस्तान दुष्टप्रचाराच्या लढाईत सामील आहे आणि पाकिस्तान यापुढेही हल्ले करतच राहील." धानोआ म्हणाले, "भारतीय हवाई दलात लहान आणि वेगवान युद्धे करण्याची क्षमता आहे."


वायुसेनेनी दोन वेळा युपीए सरकारला हवाई हल्ल्याचा प्रस्ताव दिला होता


पाकिस्तानात हवाई हल्ल्याचा भारतीय वायुसेनेच्या प्रस्ताव युपीए सरकारने दोनदा फेटाळून लावला होता याबाबत जेव्हा माजी वायुप्रमुखांना प्रश्न विचारला गेला
, तेव्हा ते म्हणाले,“संसद हल्ला आणि मुंबई हल्ल्यानंतर आम्ही सरकारला हवाई हल्ल्याचा प्रस्ताव दिला होता.आम्ही म्हटले की,आम्ही तयार आहोत पण हा एक राजकीय निर्णय होता. आमच्याकडे २००८मध्ये क्षेपणास्त्र व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्रे होती जी पाकिस्तानजवळ नव्हती. आम्हाला पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्याविषयी माहिती होती पण सरकारने तेव्हा हल्ले नाकारले. नवीन नेतृत्त्वाने निर्णय घेतला ज्यानंतर आम्ही हवाई हल्ला केला."

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121