केंद्र सरकारचा मोठा निर्णय : MTNL-BSNL आता एकच कंपनी

    23-Oct-2019
Total Views | 91




नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी सरकारी दूरसंचार कंपन्यांचे विलीनिकरण करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. दोन्ही कंपन्यांचे एकूण ३७ हजार कोटींचे भागभांडवलाचे मौद्रिकीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आकर्षक निवृत्ती वेतन योजना देण्यात येणार आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलला 4-जी स्पेक्ट्रम देण्याबद्दलही सहमती देण्यात आली आहे.

 

बीएसएनएल आणि एमटीएनएलला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी ७४ हजार कोटींच्या गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे मत दूरसंचार निगम विभागाने म्हटले होते. हा प्रस्ताव निर्मला सितारामण यांनी फेटाळला होता. त्यामुळे या कंपन्या बंद होणार अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही कंपन्यांना उभारी देण्यासाठीच्या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. सरकार विलिनिकरण योजनेवर काम करत असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा

'आयटीआयच्या' विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121