सरपंचांनी गावाची आई झाले पाहिजे

    21-Dec-2018
Total Views |

जामनेरला सरपंच-उपसरपंच मेळाव्यात भास्कर पेरे-पाटील यांचे प्रतिपादन

 
 
 
जामनेर : 
 
आई जशी आपल्या मुलांचा सांभाळ करून त्याला घडविते, तशाच प्रकारे प्रत्येक सरपंचांनी आपआपल्या गावासाठी आई झाले पाहिजे, असा मोलाचा सल्ला पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील आदर्श पुरस्कारप्राप्त सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी दिला. पेरे-पाटील बाजार समितीच्या शेतकरी निवासात आयोजित सरपंच, उपसरपंचांच्या तालुका मेळाव्यात बोलत होते.
 
 
व्यासपीठावर पुरुजीत चौधरी, श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, अशोक राजपूत, रूपाली पाटील, लीलाबाई नाईक, अश्विन राजपूत, सुनील धुरळे, प्रशांत अवसरमोल, संजय देशमुख, दीपक चव्हाण, भाविनी पाटील, युवराज पाटील, समाधान पाटील आदी होते.
 
 
सरपंचांनी मनावर घेतल्यास दोनच वर्षात गावाचा विकास होऊ शकतो.आमच्या गावात आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सकाळी दोन तास नळाद्वारे गरम पाणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, थकबाकी नसलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी सर्वप्रकारचे दळण मोफत, स्वच्छता, वृक्षारोपणासह अनेक मूलभूत सोयी-सुविधा राबविल्या जात आहेत, अशी माहितीही पोरे-पाटील यांनी दिली.
 
 
प्रास्ताविक सुहास चौधरी यांनी तर सूत्रसंचालन शांताराम जाधव आणि आभार श्रीकांत पाटील यांनी मानले. या मेळाव्यात परिसरातील सरपंच उपस्थित होते.
योजना असूनही गावाचा विकास नाही
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही सरकारी योजना नव्हती, तरीही गावागावांचा विकास होतच होता. आता तर तीनशेच्या वर योजना असूनही गावांचा विकास का होत नाही, असा प्रश्न पेरे-पाटील यांनी विचारला.
 
त्यावेळी उपस्थितांचा चेहरा पाहण्यासारखा होता. तसेच गावात जाती-पातीचे राजकारण न करता गावाच्या विकासकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांमध्ये काम करण्याची क्षमता असल्याने त्यांना जास्तीतजास्त संधी देण्याची गरजही पेरे-पाटील यांनी भाषणात सांगितली.
अग्रलेख
जरुर वाचा

'आयटीआयच्या' विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121