एक बिनधास्त लेखक...

Total Views |
 

 
 
मराठी साहित्यविश्वात त्यांनी ‘लिटील मॅगझिन’ चळवळ आणि आपल्या बिनधास्त लेखणीने वेगळाच वाचकवर्ग तयार केला होता. पठाणी वेशात ते सर्वांमध्ये वावरत असत. कालांतराने त्यांनी आपला बिनधास्त अंदाज सोडत अज्ञातवास ते आध्यात्मिक लेखन असा प्रवास केला. असे एक बिनधास्त आणि बोल्ड लेखणी लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे चंद्रकांत खोत.
 
चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला. त्यानंतर ते मुंबईतील लालबाग-परळ या ठिकाणी लहानाचे मोठे झाले. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ सातवीपर्यंत शिक्षण दिले. मात्र, चंद्रकांत खोत यांनी परिस्थितीसमोर हात न टेकता पुढे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वकष्टाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खोत यांनी पीएच.डी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी त्यांना गाईड न मिळाल्यामुळे त्यांचे पीएच.डी. करण्याचे स्वप्न भंगले. याच कालावधीत खोत यांनी साहित्यक्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले होते. खोत यांच्याबद्दल सांगण्यासारखी एक विशेष बाब म्हणजे, खोत यांचे पीएच.डी.चे स्वप्न भंगले असले तरी त्यांच्याच मूळ गावातील एका विद्यार्थ्याने त्यांच्या साहित्याचा आधार घेत आपले पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केले होते. चंद्रकांत खोत यांना त्यांच्या लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. १९९५ सालानंतर १५ वर्षं खोत हे अज्ञातवासात गेले होते. अचानक त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वातही बदल झाला होता. पठाणी वेशातले चंद्रकांत खोत वाढलेली दाढी, भगवे कपडे आणि अध्यात्माकडे वळलेले दिसू लागले. पण या पंधरा वर्षांमध्ये ते कुठे होते याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यापूर्वी खोत यांनी लिहिलेली ’उभयान्वयी अव्यय’, ’बाराखडी’, ’विषयांतर’ अशा बिनधास्त विषयांवरील कादंबर्‍या खूप गाजल्या. अशा बिधनास्त विषयांवरील त्यांच्या लेखणीने साहित्यविश्वातही मोठी खळबळ उडवली होती. मात्र, कालांतराने त्यांनी आपली लेखणी अध्यात्माकडे वळवली. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाच्या रूपाने त्यांनी एक वेगळीच वाट चोखाळली. एक कवी म्हणून साहित्यक्षेत्रातला आपला प्रवास त्यांनी सुरू केला आणि १९६९ मध्ये ’मर्तिक’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. याव्यतिरिक्त त्यांनी ’यशोदा’ या चित्रपटासाठी ’घुमला हृदयी नाद हा’, ’धर धर धरा’, ’माळते मी माळते’ ही गीते आपल्या लेखणीतून उतरवली.
 
खोत यांचे उतारवयातील जीवन हे अतिशय खडतर असेच गेले. त्यांच्याकडे स्वत:च्या हक्काचे असे घरही राहिले नव्हते. अनेक वर्षे त्यांनी आर्थर रोड येथील साईबाबा मंदिरात, तर सात रस्ता येथील पदपथावर घालवली. याच कालावधीत ते आपल्या भावाच्या घरी जात येत असत, पण रात्री मंदिरातच झोपत असत. मराठी साहित्य क्षेत्रात ’लैंगिकता’ या विषयावरील आपल्या बिनधास्त लेखनाने खळबळ उडवून देणार्‍या चंद्रकांत खोत यांची १० डिसेंबर २०१४ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी प्राणज्योत मालवली. साहित्यात आपला स्वत:चा ठसा उमटविणार्‍या आणि स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण करणार्‍या खोतांचा अखेरचा प्रवास हा अतिशय खडतर असाच होता.
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121