ना घर का ना घाट का...

Total Views |
 

 
 
 आज जिहादी तितके लाचार राहिलेले नाहीत. ज्यांनी त्यांना मोठे केले, पोसले त्यांच्यावरच ते उलटत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. आपण जेव्हा एखाद्यासाठी खड्डा खणतो, तेव्हा आपणच त्या खड्‌ड्यात पडण्याची भीती जास्त असते. त्याची प्रचिती अगदी पाकिस्तानसारख्या देशाकडे पाहून येते. सध्याची पाकिस्तानची स्थिती पाहता तो आपणच खोदलेल्या खड्‌ड्यात पडतोय की काय? अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धात असो किंवा अन्य ठिकाणी, अनेकदा तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने आपली गाडी सुरू ठेवण्यासाठी वेळेनुसार वेगळी रणनीती आखली. त्यामागचा उद्देश केवळ अशांतता आणि दुसर्‍याला त्रास देणे हाच. मात्र, आज तोच त्रास पाकिस्तानच्याच अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. पाकिस्तानमधील काही धर्मांधांच्या आणि नेत्यांच्या आशीर्वादाने हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा, तालिबान, जैश-ए-मोहम्मदसारख्या माथेफिरू लोकांच्या संघटना उभ्या राहिल्या. पाकिस्तानच्या सरकारनेही त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मदतदेखील केली. त्यातच पाकिस्तानसारख्या अस्थिर लोकशाहीच्या देशात पाकिस्तानचे असलेले लष्करही त्यांना संरक्षण देण्याच्या नावाखाली अशा संघटनांच्या आहारी गेले. अनेकदा त्यांना पैसे, शस्त्रे पुरवण्यापर्यंतचे कामदेखील पाकिस्तानने केले. आज पाकिस्तानने पोसलेल्या याच संघटनांचा सर्वाधिक फटका भारत आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना बसला. भारत, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या आणि झालेल्या अनेक घातपातांमागे याच संघटनांचा हात आहे. परंतु, या संघटनांचे क्षेत्र जसजसे वाढत गेले तसतसे अन्य देशांनाही त्यांच्या कृत्यांचे चटके बसू लागले. त्यामुळे कालांतराने भारत आणि अफगाणिस्तानप्रमाणेच अनेक देश पाकिस्तानच्या विरोधात उभे राहिले. याचा प्रामुख्याने पाकिस्तानलाही फटका बसला. जगाच्या पाठीवर पाकिस्तान एकाकी पडत गेला. पाकिस्तानने पोसलेल्या हाफिज सईद, दाऊद यांच्यासारख्या पाकिस्तानच्या आड लपून भ्याड हल्ले करणार्‍या सर्वच देशांना दहशतवादी मानले आहे. मात्र, आज पाकिस्तान त्यांना जराही हात लावण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. कारण, आज त्यांची ताकद कदाचित पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांपेक्षा वाढली आहे. आज पाकिस्तान आपणच खोदलेल्या खड्‌ड्यात पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. याच जिहादींनी आज पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचीही स्थिती ना घरका ना घाटका अशी करून ठेवली आहे.
 
चोराच्या उलट्या बोंबा
  दहशतवादाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान तोंडघशी पडल्यानंतर आता पाकिस्तानसमोर सळो की पळो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात असंख्य मुस्लिमांच्या रक्ताने माखल्याचे बेताल वक्तव्य त्यांनी केले. कदाचित आपल्या घरातच काय चालले आहे, याची कल्पना त्यांना नसावी.मंगळवारी भल्या पहाटे श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. त्याची जबाबदारीही पाकिस्ताननेच पोसलेल्या आणि मोठ्या केलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. हल्लीच अमेरिकेने पाकिस्तानला देणारी रसद बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानचीच गळचेपी झाली. त्यामुळे या जिहादींचे कुठेतरी खच्चीकरण होईल, अशी आशा होती. मात्र, परिस्थिती अगदी उलट झाली. या ठिकाणी जिहादींची नाही तर पाकिस्तानचीच गळचेपी झाली. आज त्यांच्यातल्याच एका हाफिज सईदसारख्या जिहाद्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कुठेतरी पाकिस्तानमधील काही राजकारण्यांना जाग आली आहे. त्यांनी त्याच्या पक्षाला मान्यता मिळू नये, अशी मागणी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज पाकिस्तानमधील राज्यकर्तेच सईदच्या विरोधात बोलू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परंतु, हाफिजसारख्या दहशतवाद्यावर त्याचा कोणताही परिणामझाल्याचे जाणवतही नाही. त्याने राज्यकर्त्यांच्या पोकळ धमक्यांना जराही दाद दिलेली नाही. अनेक वर्षे हाफिजला याच राजकारण्यांनी पाठिशी घातले, आज त्यांचाच धाक त्याला राहिलेला नाही. ‘‘राजकीय पक्ष म्हणजे नोंदणी करण्यासाठी काय ट्रक किंवा गाडी आहे का?’’ असा उलट सवालदेखील त्याने केला. नोंदणीविना त्याचा पक्ष निवडणुकादेखील कशा लढवेल हा प्रश्न निर्माण होतो. पण त्याच्या उमेदवारांसमोर अपक्ष म्हणून उभे राहण्याचा पर्यायदेखील खुला आहे. आज हाफिजच्या निमित्ताने दहशतवादीदेखील एका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरत आहेत. त्यापेक्षा एका देशासाठी मोठे दुर्देव तरी कोणते म्हणायचे? आज हीच बाब अगदी पाकिस्तानातील राजकीय अभ्यासकांनादेखील चकित करणारी आहे. या निमित्ताने पाकिस्तानसारखा देश आपणच खोदलेल्या खड्‌ड्यात रुतत जाणार की नाही हे आगामी काळच ठरवेल. 
 
-जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121