साईसाक्षी प्रकाशित, अनामिका आणि कान्हाज मॅजिक निर्मित 'अश्रूंची झाली फुले' या वसंतराव कानिटकरांच्या नाटकाचे फक्त ५१ प्रयोग करण्यात येणार आहेत असे सुबोध भावेने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. सुबोध भावे, शैलेश दातार, सीमा देशमुख आणि उमेश जगताप यांच्यासमवेत 'अश्रूंची झाली फुले' या अजरामर नाटकाची एक नवीन सुरुवात होत आहे.
गेल्या पाच-सहा वर्षानंतर सुबोध भावे पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा आस्वाद चाहत्यांना देण्यास येत आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी तर उत्सुकतेचा विषय आहेच पण त्याच्यासाठी सुद्धा एक नवीन आव्हान आहे.
खालील लिंकवर तुम्हाला या नाटकाचे तिकीट मिळू शकते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat