मुंबईत धान्याने भरलेला ट्रक पलटला ; ४ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



मुंबई : मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईटमध्ये धान्याने भरलेला एक ट्रक पलटी झाल्याने त्या ट्रकखाली दबून चौघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर झाला आहे. गुरुवारी रात्री ११च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. धान्याने भरलेला हा ट्रक रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने त्यात अडकून पलटी झाला आणि रस्त्यावर उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दाबले गेले.

 

धान्याने भरलेला हा ट्रक जात असताना ट्रकचे मागचे चाक गटाराचे झाकण तोडत आत रुतले. त्यामुळे ट्रक पलटला. रस्त्याकडेला उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दबले गेले. ट्रक धान्याच्या गोण्यांनी भरलेला होता. त्यामुळे लोक मदतीला धावूनही प्रत्यक्ष मदत झाली नाही. लोकांनी गोण्या काढायला घेतल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत ट्रक उचलला. पण तोपर्यंत चार जण ठार झाले होते. एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गटाराचे काम अलीकडेच आठवड्याभरापूर्वी झाले होते. ते निकृष्ट असल्यानेच झाकण तुटले गेले, असा स्थानिकांचा आरोप आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@