नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार २०१९चा अर्थसंकल्प आज संसदेत आज सादर होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. मोदी सरकारने भ्रष्टाचाराला थारा दिला नसल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. पुढील चार महिन्यासाठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे.
• रेल्वे खात्यासाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद
• २४ तासांत आयटी रिटर्नची प्रक्रिया पूर्ण होणार
• देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवांशांमध्ये दुपटीने वाढ झाली
• गर्भवती महिलांसाठी २६ आठवड्यांची पगारी सुट्टी मिळणार
• २१ हजारापर्यंत पगार असलेल्या कामगारांना ७ हजार रुपये बोनस मिळणार
• वन रँक वन पेन्शनसाठी डिफेन्स बजेटमध्ये ३५ हजार कोटी
• येत्या पाच वर्षांत १ लाख डिजिटल गावांची निर्मिती करणार
• गरीबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
• ग्रॅच्युइटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये
• प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत १५ हजार रुपये कमाई असलेल्यांना पेन्शन मिळणार• गरीबांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
• मोदी सरकारने एक कोटी ५३ लाख घरांची निर्मिती केली
• हरियाणामध्ये २२ वे AIIMS हॉस्पिटल सुरू करणार
• मत्स्यपालनासाठी नवा आयोग स्थापन करण्यात येणार
• किसान क्रेडिट कार्ड आता पशुपालनासाठीही वापरता येणार
• गोमातेचा सन्मान करण्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करणार
• दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार
• राज्यांना आधीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचे उत्पन्न मिळणार
• २०२० पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार तर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार
• कोळसा आणि स्पेक्ट्रम अशा नैसर्गिक साधनसंपत्ती वाटपात पारदर्शकता आणली
• मोदींच्या कार्यकाळात भारत प्रगतीकडे वाटचाल करणारा देश ठरतो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो