दुबई : येथे सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली. स्पर्धेतील सुपर-४ सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सर्वच आघाड्यावर बांगलादेशच्या वरचढ ठरला. विशेष म्हणजे जवळपास वर्षभरानंतर एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या ४ खेळाडूंना बाद केले. दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/