दरम्यान, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा सर्व आघाड्यांवर भारताने जोरदार कामगिरी करत करोडो भारतीयांना अपेक्षित असलेली कामगिरी केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा डाव १६२ धावांवर गडगडला. १६३ धावांचे माफक लक्ष समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ गडी गमावत पाकिस्तानचे नामोहरण केले. या विजयांनंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.