·
ठाणे : जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील मुख्य बाजार परिसरातील जांभळी नाका येथे असलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिरातच चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी मंदिरातून आठ ते नऊ लाखांची रोकड तसेच सोने आणि चांदिचे दागिने असा अंदाजे 30 ते 32 लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. मंदिरात सणाचे निमित्त साधत चोरांनी हा कट रचत चोरी केली. ही चोरी मध्यरात्री केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/