"AIT म्हणजे काय रे भाऊ?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018   
Total Views |


 


अरे, जे प्याले असता, बरे का, मनुष्याला सकाळी बोललेलं दुपारी आठवत नाही, दुपारी बोललेलं संध्याकाळी आठवत नाही, त्याला दारू असे म्हणतात.पुलंच्या दोन भावातील संवादाच्या धरती वर “AIT म्हणजे काय रे भाऊ?” हा संवाद.

 

AIT म्हणजे काय रे भाऊ?

 

छोटा : AIT म्हणजे काय रे भाऊ?

 

मोठा : अरेSS! AIT म्हणजे Aryan Invasion Theory, हा एक प्रकारचा सिद्धांत आहे.

 

छोटा : सिद्धांत म्हणजे रे काय असते भाऊ?

 

मोठा : सिद्धांत म्हणजे, बरे का, कल्पना किंवा अटकळ, ज्याने एखाद्या घटनेचे स्पष्टीकरण देता येते. जसे - डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा विश्वाची उत्पत्ती सांगणारी Big Bang Theory. कधी-कधी अधिक संशोधनानंतर काही सिद्धांत रद्द करावे लागले आहेत, जसे - Dalton’s Atomic Theory, किंवा सूर्य विश्वाचे केंद्र आहे असे सांगणारा Heliocentric Universe चा सिद्धांत रद्द केले गेले.

 

छोटा : असे होय! भाऊ रे, हा AIT चा सिद्धांत काय सांगतो?

 

मोठा : अरे! हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत असे सांगतो, बरे का, की पूर्वीच्या काळी किनई सिंधू खोऱ्यातील राहणारे लोक अगदीच मागासलेले होते. त्यांना AIT ने द्रविडअसे म्हटले. तर, त्या द्रविडांकडे साधे रथ आणि घोडे नव्हते! माहितय? मग काय झालं? इस पूर्व १५०० दरम्यान, त्या मागासलेल्या द्रविडांवर प्रगत आर्यांनी आक्रमण करून त्यांना दक्षिणेला हाकलून दिले आणि आर्य लोक उत्तर भारतात स्थाईक झाले.

 

छोटा : ओह! म्हणजे आर्य लोक घोड्यावरून टॉगडॉक टॉगडॉक करत S क्रS S S’ म्हणत आले आणि द्रविडांशी युद्ध केले का रे भाऊ? त्यांच्या युद्धाच्या काही खुणा मिळतात का रे?

 

मोठा : अरेच्चा! थोडास घोळ झाला बहुतेक. काय आहे, युद्धाचे काही पुरावे सापडले नाहीत. मग असे म्हटले की - आर्य घोडे जुंपलेल्या वेगवान रथातून, बायका-पोरांना, म्हाताऱ्या-कोताऱ्याना घेऊन भारतात आले. युद्ध वगैरे काही केले नाही.

 

छोटा : छ्या! मग ह्याला कसलं आक्रमणम्हणायचं? हे तर स्थलांतर झाले.

 

मोठा : हम्म! तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण सिद्धांताचे नाव बदलू. आपण आक्रमणच्या ऐवजी स्थलांतरकेले असे म्हणू. Aryan Migration Theory!

 

छोटा : पण तुला माहितय का भाऊ? MtDNA म्हणजे आईकडून मुलीकडे जाणाऱ्या Mitochondrial DNA चा अभ्यास केला असता, असे कळते की भारतीय स्त्री हिच येथील लोकांची आई आहे, बाहेरची स्त्री नाही.

 

मोठा : असे आहे होय? थांब थांब! आपण सिद्धांत बदलू. असे म्हणू की स्थलांतर करून येणारे फक्त पुरुष होते. त्यांच्या तांड्यामध्ये बायका नव्हत्या. शिवाय आर्यांच्या पितृसत्ताक पद्धतीला हे अनुसरूनच आहे.

 

छोटा : ऑं? जाऊ देत, हे सांग, सिंधू ही त्या काळातली जगातील सर्वात मोठी वसाहत होती. त्या वसाहतीतील लोकांना हाकलून लावायला, मध्य आशियात प्रचंड मोठ्या संख्येत पुरुष होते का?

 

मोठा : फारच अणुकुचीदार प्रश्न आहे बुवा हा. थांब, आपण परत सिद्धांत बदलू. असे म्हणू की, शेकडो वर्ष आर्यांच्या टोळ्यांच्या लाटा येत होत्या. Migration in waves.

 

छोटा : भाऊ, असा कसा रे हा सिद्धांत, प्रश्ना प्रश्नाला बदलणारा? बर, मला सांग, आर्यांनी आल्यावर काय केले?

 

मोठा : भक्कम तटबंदी असलेल्या आटपाट नगरातील लाखो द्रविडांना हाकलून लावले.

 

छोटा : भाऊ रे! तटबंदी असलेली आटपाट नगर बांधणारे स्थानिक लोकं मागासआणि हे भटके आर्य प्रगतरे कसे?

 

मोठा : आता आली का पंचाईत?! जाऊ दे आपण परत सिद्धांत बदलू. आर्य प्रगत नव्हते. ते रानटी लोक होते असे म्हणू.

 

छोटा : फारच लवचिक आहे बुवा हा सिद्धांत! असो. पण त्या रानटी आर्यांची तर चैनच झाली. उन, वारा, वादळ, पाउस, नदी, नाले, डोंगर, दऱ्या कशाचा बाऊ न करता भटकत होते बिचारे, पण आता त्यांना राहायला आयत्याच well planned cities आणि ready possession घरे मिळाली!

 

मोठा : क्लॅक! नाही काई! आर्य तिथे राहिलेच नाहीत मुळी! द्रविड निघून गेल्यावर सगळी गावे ओस पडली.

 

छोटा : ऑ!! मग आर्य गेले कुठे?

 

मोठा : मी तर आता बुचकळ्यातच पडलो!

 

छोटा : बरे, ते जाऊ दे! भाऊ, मला सांग, जर द्रविड दक्षिणेला गेले, तर आधीच दक्षिणेत रहात असलेल्या लोकांना त्यांनी कुठे हाकलून दिले?

 

मोठा : जा बुवा! तू तर फारच प्रश्न विचारतोस!

 

छोटा : बरे तर मग! जाऊ देत तो प्रश्न! हे आर्य कोणत्या मार्गाने आले रे भाऊ?

 

मोठा : ते किनाई मध्य आशिया मधून दक्षिणेकडे सरकत हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात आले.

 

छोटा : अबबबब! पण भाऊ, रथ तर मैदानी प्रदेशाचे वाहन आहे. ती भली मोठी पर्वत रांग त्यांनी रथातून कशी काय रे ओलांडली?

 

मोठा : छे बुवा! अशा प्रश्नाचे उत्तर न देता, असे प्रश्न विचारणाऱ्याला आम्ही हिंदुत्ववादीम्हणतो!

 

छोटा : बर मग ते ही राहू दे. आले समजू ते कसेतरी त्यांचे रथ घेऊन. पण मला सांग सिनौली गावात ४,००० वर्षांपूर्वीच्या रथांचे अवशेष मिळाले आहेत. म्हणजे आर्य यायच्या आधीच इथे रथ होते. कदाचित ते रथ घोड्यांनी सुद्धा ओढले असतील. मग?

 

मोठा : काय आहे, हा रथांचा शोध किनई नवीन आहे. त्यातून निघणारे निष्कर्ष कसे खोडून काढायचे ते अजून ठरायचंय.

 

छोटा : बरे तर! मग, आर्यांनी आल्यावर पुढे काय केलं?

 

मोठा : पुढच्या एक हजार वर्षात या आर्यांनी - संस्कृत भाषा विकसित केली. ४ वेदांच्या शेकडो शाखा, १० - १२ उपनिषदे, ६ शास्त्रे, कित्येक सूत्र ग्रंथ, व्याकरण, छंद, ज्योतिष, रामायण, महाभारत वगैरे काय काय रचले. मौखिक परंपरा जपण्यासाठी, पाठांतराच्या विविध पद्धती तयार केल्या, आणि सगळं ज्ञान कंठस्थ करून ठेवले.

 

छोटा : भारीच की! हे रानटी लोक एकदम सुसंस्कृतच झाले म्हणायचे! लोकांच्या घरात घुसून त्यांना हकलायचा रानटीपणा सोडून त्यांना भाषा, व्याकरण, काव्य, गायन, तत्त्वज्ञान वगैरे लिहायची उपरती कशी काय झाली? आणि ते सुद्धा फक्त १,००० वर्षात? कसं रे जमलं त्यांना भाऊ?

 

मोठा : फारच बुवा तुझ्या शंका! त्यांनी हे सगळं सरस्वती नदीच्या काठावर बसून लिहिले. ती ज्ञानदेवता त्यांना पावली असेल असे म्हण, हवे तर! मग तर झालं?

 

छोटा : पण भाऊ! सरस्वती नदी तर इस पूर्व १५०० च्या कितीतरी आधी म्हणजे AIT नुसार आर्य यायच्या आधीच वाळून गेली होती! मग त्या कोरड्या नदीच्या काठावर बसून, आर्यांनी का बरे सरस्वती नदीचे गोडवे गायले?

 

मोठा : तू नको नको ते प्रश्न विचारतोस बुवा. ते सोड! भारतीयांच्या DNA मध्ये R1a haplogroup मिळतो ते काय उगीच का? आर्य भारतात आल्याचा तो भक्कम पुरावा आहे.

 

छोटा : रे भाऊ! R1a फक्त उच्च वर्णीय नागरी लोकांतच नाही तर, AIT ज्यांना मूलनिवासीम्हणते त्या वनवासी, द्रविड, दलित सर्वांमध्ये R1a मिळतो.

 

मोठा : छे बुवा! मी तर तुझ्या पुढे अगदी हातच टेकले! R1a असलेले आर्य, संस्कृत भाषा घेऊन आले, माहीतय?

 

छोटा : अरे, भाषेचा आणि DNA चा काय संबंध? आता तू इंग्रजी बोलतो ते काय तुझ्या DNA मध्ये आहे का?!

 

मोठा : पण, पण त्या राखीगढीच्या DNA मध्ये R1a सापडला नाही, त्याचे काय? सांग ना काय त्याचे?

 

छोटा : राखीगढीच्या दोन सापळ्यात R1a मिळाला नाही, त्या अर्थी R1a बाहेरूनच आला हे कशावरून?

 

मोठा : छे बुवा! आता कसं सांगू तुला, AIT म्हणजे काय ते?

 

छोटा : थांब, आता मीच सांगतो! AIT असा सिद्धांत आहे, जो वाचला असता, बरे का, जो वाचला असता, भारतीय लोकांना सवर्ण-दलित, उच्च-नीच, आर्य-द्रविड, उत्तरेचे-दक्षिणेचे, परदेशी-मूलनिवासी, नागरी-वनवासी, नाकेले-नकटे, गोरे-काळे अशा कोणत्याही दोन विरुद्ध गटात टाकून त्यांच्यात द्वेष निर्माण करता येतो, त्या सिद्धांताला AIT असे म्हणतात!

 

मोठा : वा रे वा! आला मोठा Nationalistic कुठला! साफ चूक आहे हे! पुन्हा एक प्रयत्न कर!

 

छोटा : बरे तर! AIT वाचल्याने मनुष्याला चित्रविचित्र भास होऊ लागतात. आणि तो भ्रमिष्टासारखे – “भारतात ऐतिहासिक काळात झालेली इस्लामी व युरोपियन आक्रमणे आर्यांच्या आक्रमणांच्या तुलनेत अगदीच किरकोळ होती! औरंगझेब, टिपू सुलतान, खिलजी, गोव्यातील पोर्तुगीज, किंवा इंग्रज वगैरे मंडळी त्या हिंस्रआर्यांपुढे मनीमऊच्या पिल्लांसारखी गोंडस होती!असे बरळू लागतो.

 

मोठा : अरे जा, जा छुटक्या! तुझे मत कोण ऐकून घेणारय? तू थोडी माझ्यासारखा intellectual आहेस?

 

छोटा : अरे! मला नावं ठेवण्यापेक्षा, त्या सिद्धांताकडे डोळसपणे पाहून इतिहासातील चुका दुरुस्त कर!

 

मोठा : आता तूच नव्याने इतिहास लिहिणार की काय रे छुटक्या?! Rightist कुणीकडचा!

 

छोटा : अरेSSS! भावाभावात भांडणे लावणारा हा सिद्धांत निव्वळ कल्पनेचा खेळ आहे असे तूच सुरुवातीला म्हणलेस ना? किती दिवस तू छोट्या भावाला कोंड्यावर विकत घेतलंयअशा बालिश बाता मारणार आहेस? तो खोटारडा सिद्धांत सोड आणि चल माझ्याबरोबर खेळायला!

 

संदर्भ

. Harappan site of Rakhigarhi: DNA study finds no Central Asian trace, junks Aryan invasion theory. - Economic Times, 13 June 2018

. Genetic study dismisses Aryan invasion as myth - Times of India, Mirror (Pune), Jul 06 2015

. New research debunks Aryan invasion theory - DNAIndia - 10 Dec 2011

. Sanauli Find Challenges Aryan Invasion Theory and Could Re-write Indian History - Ancient Origins, 23 June 2018

. "The genetic component which spread beyond India is significantly higher in India than in any other part of world. This implies that this genetic component originated in India and then spread to West Asia and Caucasus," said Gyaneshwar Chaube of University of Tartu, Estonia. - India Today, 10 Dec, 2011

. ... the origin of the R1a is far from settled ...

... it is almost certainly the case – tribal communities with high proportions of R1a assimilated into the caste matrix over the millennia. So how correct is it to link the R1a with an Indo-European migration?

- Genetics Might Be Settling The Aryan Migration Debate, But Not How Left-Liberals Believe - by Anil Kumar Suri

. Genetics and the Aryan invasion debate – Koenraad Elst, June 2017.

. ... The westward Indo-Aryan expansion is a plausible explanation for the male-mediated demic expansions of R1a1a (R-M17) into Europe beginning around 2,500 BCE, which, to a large extent, replaced indigenous European males and their Y-chromosome strata. It also explains R1a1a’s diversification into the European R1a-Z282 and Asian R1a-Z93 branches....

... large number of ancient Harappan DNA samples need to be tested...

- Propagandizing the Aryan Invasion Debate: A Rebuttal to Tony Joseph - A. L. Chavda

. ... Up to 6000 BC, Europe was inhabited by dark skinned meat-eating hunters, who were nearly completely replaced by the arriving light-skinned Asians...

... The mtDNA of the southern Indian locations have ultimately spread all over India and have even migrated to Europe during the Iron Age....

- The Climate Change and the Environmental basis for the Human migrations during Holocene. Dr. P. Priyadarshi, MD, FRCP Edin, 16 July 2016

१०. ... there was strong sex bias in Bronze Age migrations. In other words, those who migrated were predominantly male ...

- How genetics is settling the Aryan migration debate - Tony Joseph, The Hindu, 16 June 2017

११. ... AIT is of an entirely more impressive order than the relatively inconsequential Islamic or European colonial invasions ...

... India is composed of a large number of small populations ...

- 4500-year-old DNA from Rakhigarhi reveals evidence that will unsettle Hindutva nationalists - Kai Friese

१२. Lies, deception and character assassination: Aryan invasion propaganda touches new low - Abhijit Chavda 7, Sep 2018

@@AUTHORINFO_V1@@