हे फळ खाल्यास अपत्यप्राप्ती, मौलनाचा अजब दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |
 

 

औरंगाबाद : ज्यांना मुल नाही त्यांनी माझ्याकडे या, आमच्या दर्ग्यातील या झाडाचे फळ खाल्यास केवळ निपुत्रीकांनाच नव्हे तर तृतीयपंथीयांनाही मुले होतात, असा दावा दर्ग्यातील एका मौलानाने केला आहे. दर्ग्यात आसेचे झाड आहे. त्याचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांनाही मुले होतील. इतकंच नव्हे ही फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनी देखील मुल होऊ शकेल, असा दावा तो करतो. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकत्यांनी या मौलवीची पोलखोल केली आहे. समितीच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार समोर आला आहे. संबंधित मौलानाविरोधात जादू टोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 

 
 खुलताबाद येथे हजरत शेख शा जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी यांचा हा दर्गा आहे. या दर्गा परिसरात आसेचे झाड आहे. येथील एका तलाव ‘परीयों का तालाब’, असे नाव आहे. दर्गा परिसरातील आसेच्या झाडाबाबतच्या चमात्कारांचा दावा मोहम्मद समीर मुजावर या मौलानाने केला आहे. आसेच्या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना अपत्यप्राप्ती होते, असा दावा मौलानाने केला आहे. तसेच परिसरातील ‘परीयो का तालाब’ येथे आंघोळ केल्यास त्या व्यक्तीच्या अंगात असलेले भूत, प्रेतात्मा निघून जातात, दुर्धर आजारही बरा होतो, लग्न जमेत नसेल तर लग्नही होते, असा दावा संबंधित मौलाना करतो. मौलानाने अवैज्ञानिक चमत्कारांचा दावा करुन जनतेची फसवणूक केली. हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अनिसने केली आहे.
 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@